शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

2 विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये तणाव वाढला, CBIचे पथक दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 17:14 IST

Manipur Violence: मागील काही महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा पेटली आहे.

Manipur Clash: मागील काही महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा पेटली आहे. मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांचे अपहरण आणि हत्येनंतर हिंसा भडकली आहे. आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे पथक बुधवारी (27 सप्टेंबर) विशेष विमानाने इम्फाळला पोहोचले. या टीमचे नेतृत्व एजन्सीचे विशेष संचालक अजय भटनागर करत आहेत. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, बुधवारी इंफाळमधील सीएम सचिवालयापासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या मोइरांगखोम येथे दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या गोळ्या झाडल्या. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जुलैमध्ये बेपत्ता झालेल्या दोन तरुणांच्या अपहरण आणि हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत विद्यार्थी सहभागी झाले होते. बेपत्ता तरुणाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 'वुई वॉन्ट जस्टिस'च्या घोषणा देत विद्यार्थी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या बंगल्याकडे जात होते. मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणीरॅलीचे नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते लांथेंगबा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या दोन तरुणांची हत्या करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. दोन्ही तरुणांच्या मारेकऱ्यांना 24 तासांच्या आत अटक करावी आणि त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणावेत, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी दगडफेक सुरू केल्याने परिस्थिती अचानक बिघडली. यानंतर पोलिसांनाही प्रत्युत्तर द्यावे लागले. मणिपूर अशांत राज्य म्हणून घोषितईशान्येकडील मणिपूर राज्यात परिस्थिती गंभीर झाल्याने राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने संपूर्ण राज्य 'अशांत क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. तणावाची परिस्थिती पाहता इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाल्यानंतर सरकारने अलीकडेच 23 सप्टेंबर रोजी मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत केली होती. पण, पुन्हा एकदा हिंसेची आग वाढत चालली आहे. मणिपूरमधील वाढत्या तणावामुळे मंगळवारपासून पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारCBIगुन्हा अन्वेषण विभागCrime Newsगुन्हेगारी