शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर हिंसाचाराचा अंत; सर्वात जुन्या मैतेई बंडखोर गटाने शस्त्रे टाकली, अमित शहांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 18:12 IST

मणिपूरमधील सर्वात जुन्या सशस्त्र बंडखोर गटाने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे.

Manipur Violence: मागील अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. मणिपूरमधील सर्वात जुना सशस्त्र गट, यूएनएलएफने (UNLF) हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे मान्य केले आहे. तसेच, UNLF ने शांतता करारावरही स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी बुधवारी(29 नोव्हेंबर) ही माहिती दिली.

गृहमंत्री शाह यांनी त्यांच्या X हँडलवर काही फोटो, व्हिडिओ शेअर केली आहेत, ज्यात सशस्त्र दलातील जवान त्यांची शस्त्रे टाकताना दिसत आहेत. याबाबत अमित शहा म्हणतात की, "ऐतिहासिक घटना, युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) ने आज नवी दिल्ली येथे शांतता करारावर स्वाक्षरी केली. यामुळे ईशान्येत शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकारच्या अथक प्रयत्नांमध्ये एक नवीन अध्याय जोडला गेला आहे."

गृहमंत्री पुढे म्हणाले, "मणिपूर खोऱ्यातील सर्वात जुना सशस्त्र गट, यूएनएलएफने हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे मान्य केले आहे. मी त्यांचे लोकशाही प्रक्रियेत स्वागत करतो आणि शांतता आणि प्रगतीच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. आज भारत सरकार आणि मणिपूर सरकारने UNLF सोबत केलेल्या शांतता कराराने सहा दशकांच्या सशस्त्र चळवळीचा अंत झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या आणि ईशान्य भारतातील तरुणांना चांगले भविष्य प्रदान करण्याच्या प्रयत्नात ही ऐतिहासिक कामगिरी आहे," असे शहा म्हणाले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारCentral Governmentकेंद्र सरकारAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी