शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मणिपूर हिंसाचारप्रकरणी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, शांतता समिती गठीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 16:54 IST

विविध जाती संघटनांमध्ये सामंजस्यपूर्ण संवाद साधता यावा, यासाठी शांतता समिती सामाजिक सलोखा आणि बंधुता वाढवण्यासाठीही प्रयत्न करणार आहे.

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचार प्रकरणाबाबत (Manipur Violence) मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)  अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत. हिंसाचाराच्या प्रकरणी केंद्र सरकारने मणिपूरच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती (Peace Committee) स्थापन केली आहे. या समितीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश असणार आहे. यासोबतच अनेक माजी नागरी सेवकांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समितीच्या सदस्यांमध्ये मुख्यमंत्री, राज्य सरकारचे काही मंत्री, खासदार, आमदार आणि विविध राजकीय पक्षांचे नेते यांचा समावेश आहे. या समितीत माजी नागरी सेवक, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध जातीय समूहांच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात आला आहे. राज्यातील विविध जातीय समूहांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची प्रक्रिया सुलभ करणे, ज्यामध्ये विवादित पक्ष/गटांमधील शांततापूर्ण संवाद आणि वाटाघाटी यांचा समावेश आहे, हे समितीचे उद्दिष्ट असणार आहे.

विविध जाती संघटनांमध्ये सामंजस्यपूर्ण संवाद साधता यावा, यासाठी शांतता समिती सामाजिक सलोखा आणि बंधुता वाढवण्यासाठीही प्रयत्न करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 29 मे 2023 ते 1 जून 2023 या कालावधीत मणिपूर राज्याचा दौरा केला होता आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शांतता समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. मणिपूरमध्ये अजूनही हिंसाचाराचा काळ सुरूच आहे. 

दरम्यान, शुक्रवारी सैनिकांच्या गणवेशात आलेल्या मैती समाजाच्या अतिरेक्यांनी आधी गावकऱ्यांना कोबिंगच्या बहाण्याने घराबाहेर बोलावले आणि नंतर त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. मणिपूर हिंसाचाराचा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने आतापर्यंत सहा एफआयआर नोंदवले आहेत, ज्यामध्ये पाच गुन्हेगारी कटाशी संबंधित आहेत. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार