शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

बलात्कारानंतर शरीरावर ठोकले खिळे, नंतर जिवंत जाळले, मणिपूरमध्ये ३ मुलांच्या आईसोबत क्रौर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 13:58 IST

Manipur Violence: मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यातील एका गावामध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी एका घरात घुसून तीन मुलांच्या आईसोबत क्रूर कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या ३१ वर्षी महिलेचा क्रूरपणे क्षण केल्यानंतर हल्लेखोरांनी तिला जिवंत जाळले.

जवळपास दीड वर्ष उलटत आलं तरी मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार अद्याप थांबण्याचं नाव घेत नाही आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. मागच्या वर्षी दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढल्याच्या घटनेचे पडसाद जगभरात उमटले होते. दरम्यान, आता त्यापेक्षा भयानक घटना मणिपूरमध्ये घडली आहे. येथे जिरीबाम जिल्ह्यातील एका गावामध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी एका घरात घुसून तीन मुलांच्या आईसोबत क्रूर कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या ३१ वर्षी महिलेचा क्रूरपणे क्षण केल्यानंतर हल्लेखोरांनी तिला जिवंत जाळले. आता अटॉप्सी रिपोर्टमधून याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पीडित महिलेल्या पतीने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये घरामध्ये घुसून माझ्या पत्नीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता, असा दावा केला आहे. मात्र आसाममधील सिलचर मेडिलक कॉलेजमध्ये झालेल्या पोस्टमार्टेममधून महिलेवर बलात्कार करण्यात आला होता किंवा नाही, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत होता. त्यामुळे तिच्या  गुप्तांगातून स्मीयर गोळा करण्याची कुठलीही शक्यता नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.  

या महिलेचं शरीर ९९ टक्क्यांपर्यंत जळून गेलं होतं. तसेच तिच्या हाडांचीही जवळपास राख झाली होती. अटॉप्सी रिपोर्टमधून या महिलेसोबत करण्यात आलेल्या क्रूर कृत्याबाबत एवढी भयावह माहिती समोर आली आहे की, त्याबाबत अधिक लिहिणंही शक्य नाही.  या रिपोर्टमध्ये महिलेच्या उजव्या मांडीमागे घाव आणि डाव्या मांडीमध्ये खिळा घुसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर महिलेच्या शरीरावरील काही अवयवही गायब झालेले होते.  

दरम्यान, कुकी-जो संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच ही घटना क्रूर असल्याचे सांगत सुरक्षा यंत्रणा आरोपींचा शोध घेऊ न शकल्यानेही नाराजी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारCrime Newsगुन्हेगारी