शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

मणिपूर ते मुंबई ६,२०० किमी राहुल गांधीची ‘भारत न्याय यात्रा’; १४ जानेवारीपासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 05:38 IST

१४ राज्ये व ८५ जिल्ह्यांमधून प्रवास

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मागील वर्षी दक्षिणेतून उत्तरेपर्यंत पार पडलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात १४ जानेवारी ते २० मार्चदरम्यान ‘भारत न्याय यात्रा’ काढण्यात येणार आहे. याची घोषणा कॉंग्रेसने बुधवारी केली. मणिपूरपासून सुरू होऊन मुंबईपर्यंत जाणारी ही यात्रा १४ राज्ये आणि ८५ जिल्ह्यांतून ६२०० किलोमीटर अंतर कापणार आहे.

राहुल गांधी यांनी ७ डिसेंबर २०२२ ते ३० जानेवारी २०२३ दरम्यान कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा पूर्ण केली होती. १३६ दिवसांच्या यात्रेत राहुल यांनी १२ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातील ७५ जिल्ह्यांतून ४ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला होता. त्यानंतर आता  ‘भारत न्याय यात्रा’ मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमधून मुंबईत संपणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकारांना दिली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे १४ जानेवारीला इम्फाळ येथून यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील.

फायदा काय?

भारत जाेडाेचा फायदा कर्नाटक, तेलंगणामध्ये झाला हाेता. आता न्याय यात्रेचा फायदा लाेकसभा निवडणुकीत हाेण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या दृष्टीने ही राज्ये अत्यंत महत्त्वाची आहेत.

सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायासाठी...

जयराम रमेश म्हणाले की, राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’मध्ये आर्थिक विषमता, ध्रुवीकरण आणि हुकूमशाहीचे मुद्दे उपस्थित केले होते, तर ‘न्याय यात्रा’ देशातील लोकांसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय यावर लक्ष केंद्रित करील. भारत न्याय यात्रेत एकता, प्रेम आणि समरसतेचा संदेश दिल्यानंतर गांधी आता देशातील जनतेला न्याय मिळवून देणार आहोत.

बस व पदयात्रा...

पक्षाचे सरचिटणीस (संघटन) के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले, की या यात्रेदरम्यान देशातील महिला, तरुण आणि वंचित समाजातील लोकांशी चर्चा केली जाणार आहे. ‘भारत न्याय यात्रा’ बहुतांश बसने निघेल; पण काही ठिकाणी पायी यात्राही निघेल.

सुरुवात मणिपूरमधून का? 

हिंसाचारामुळे मणिपूरमधील लोकांच्या मनावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या जखमा भरून काढण्यासाठी मणिपूरमधून यात्रा सुरू करत असल्याचे वेणुगोपाल म्हणाले.

रुपरेषा तयार हाेतेय...

‘इंडिया’विरोधी आघाडीचे इतर गट या यात्रेत सहभागी होतील का, असे विचारले असता वेणुगोपाल म्हणाले की, कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली जात आहे. रमेश म्हणाले की, ‘भारत जोडो यात्रे’मध्ये विविध राजकीय पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा