शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

मणिपूर ते मुंबई ६,२०० किमी राहुल गांधीची ‘भारत न्याय यात्रा’; १४ जानेवारीपासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 05:38 IST

१४ राज्ये व ८५ जिल्ह्यांमधून प्रवास

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मागील वर्षी दक्षिणेतून उत्तरेपर्यंत पार पडलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात १४ जानेवारी ते २० मार्चदरम्यान ‘भारत न्याय यात्रा’ काढण्यात येणार आहे. याची घोषणा कॉंग्रेसने बुधवारी केली. मणिपूरपासून सुरू होऊन मुंबईपर्यंत जाणारी ही यात्रा १४ राज्ये आणि ८५ जिल्ह्यांतून ६२०० किलोमीटर अंतर कापणार आहे.

राहुल गांधी यांनी ७ डिसेंबर २०२२ ते ३० जानेवारी २०२३ दरम्यान कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा पूर्ण केली होती. १३६ दिवसांच्या यात्रेत राहुल यांनी १२ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातील ७५ जिल्ह्यांतून ४ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला होता. त्यानंतर आता  ‘भारत न्याय यात्रा’ मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमधून मुंबईत संपणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकारांना दिली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे १४ जानेवारीला इम्फाळ येथून यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील.

फायदा काय?

भारत जाेडाेचा फायदा कर्नाटक, तेलंगणामध्ये झाला हाेता. आता न्याय यात्रेचा फायदा लाेकसभा निवडणुकीत हाेण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या दृष्टीने ही राज्ये अत्यंत महत्त्वाची आहेत.

सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायासाठी...

जयराम रमेश म्हणाले की, राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’मध्ये आर्थिक विषमता, ध्रुवीकरण आणि हुकूमशाहीचे मुद्दे उपस्थित केले होते, तर ‘न्याय यात्रा’ देशातील लोकांसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय यावर लक्ष केंद्रित करील. भारत न्याय यात्रेत एकता, प्रेम आणि समरसतेचा संदेश दिल्यानंतर गांधी आता देशातील जनतेला न्याय मिळवून देणार आहोत.

बस व पदयात्रा...

पक्षाचे सरचिटणीस (संघटन) के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले, की या यात्रेदरम्यान देशातील महिला, तरुण आणि वंचित समाजातील लोकांशी चर्चा केली जाणार आहे. ‘भारत न्याय यात्रा’ बहुतांश बसने निघेल; पण काही ठिकाणी पायी यात्राही निघेल.

सुरुवात मणिपूरमधून का? 

हिंसाचारामुळे मणिपूरमधील लोकांच्या मनावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या जखमा भरून काढण्यासाठी मणिपूरमधून यात्रा सुरू करत असल्याचे वेणुगोपाल म्हणाले.

रुपरेषा तयार हाेतेय...

‘इंडिया’विरोधी आघाडीचे इतर गट या यात्रेत सहभागी होतील का, असे विचारले असता वेणुगोपाल म्हणाले की, कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली जात आहे. रमेश म्हणाले की, ‘भारत जोडो यात्रे’मध्ये विविध राजकीय पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा