शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर, रेल्वे सुरक्षेवर केंद्र सरकारला घेरणार; पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेस सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 10:11 IST

आगामी पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालावे अशी काँग्रेसची इच्छा आहे.

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचार, वाढती महागाई, बेरोजगारी, रेल्वे सुरक्षा आणि विविध राज्यांच्या राज्यपालांनी स्वत:च्या वागणुकीने देशाच्या घटनात्मक चौकटीवर केलेला हल्ला यासह देशातील विविध गंभीर प्रश्नांवर संसदेत केंद्र सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे.

आगामी पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालावे अशी काँग्रेसची इच्छा आहे, असे प्रतिपादन करतानाच पक्षाने रविवारी यासदर्भात पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस संसदीय पक्षाच्या आणि रणनीती गटाच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना, सीसीपी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संपर्क विभागाचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, ‘पंतप्रधानांनी दोन महिन्यांनंतरही मणिपूर हिंसाचारावर मौन सोडले नाही, त्यांनी त्यांचे मौन सोडावे, अशी पक्षाची इच्छा आहे.’

याशिवाय, त्यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार करीत गृहमंत्र्यांच्या मणिपूर दौऱ्यातून काहीही निष्पन्न झाले नाही कारण अशांत राज्यात हिंसाचार सुरूच आहे, असा आरोप केला. पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीची खासदारांना माहिती दिली, अशा बैठका सुरूच राहतील आणि पुढील बैठक बंगळुरूमध्ये होईल, असे खरगे म्हणाले. समान नागरी संहितेबाबत काँग्रेस नेते म्हणाले, पक्षाने १५ जून रोजी भूमिका आधीच स्पष्ट केली होती. गेल्या १५ दिवसांत या प्रकरणात नवीन काहीही आले नसल्याने पक्षाकडे त्यात जोडण्यासारखे काहीही नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेस