शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

मणिपूर, रेल्वे सुरक्षेवर केंद्र सरकारला घेरणार; पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेस सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 10:11 IST

आगामी पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालावे अशी काँग्रेसची इच्छा आहे.

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचार, वाढती महागाई, बेरोजगारी, रेल्वे सुरक्षा आणि विविध राज्यांच्या राज्यपालांनी स्वत:च्या वागणुकीने देशाच्या घटनात्मक चौकटीवर केलेला हल्ला यासह देशातील विविध गंभीर प्रश्नांवर संसदेत केंद्र सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे.

आगामी पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालावे अशी काँग्रेसची इच्छा आहे, असे प्रतिपादन करतानाच पक्षाने रविवारी यासदर्भात पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस संसदीय पक्षाच्या आणि रणनीती गटाच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना, सीसीपी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संपर्क विभागाचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, ‘पंतप्रधानांनी दोन महिन्यांनंतरही मणिपूर हिंसाचारावर मौन सोडले नाही, त्यांनी त्यांचे मौन सोडावे, अशी पक्षाची इच्छा आहे.’

याशिवाय, त्यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार करीत गृहमंत्र्यांच्या मणिपूर दौऱ्यातून काहीही निष्पन्न झाले नाही कारण अशांत राज्यात हिंसाचार सुरूच आहे, असा आरोप केला. पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीची खासदारांना माहिती दिली, अशा बैठका सुरूच राहतील आणि पुढील बैठक बंगळुरूमध्ये होईल, असे खरगे म्हणाले. समान नागरी संहितेबाबत काँग्रेस नेते म्हणाले, पक्षाने १५ जून रोजी भूमिका आधीच स्पष्ट केली होती. गेल्या १५ दिवसांत या प्रकरणात नवीन काहीही आले नसल्याने पक्षाकडे त्यात जोडण्यासारखे काहीही नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेस