शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मणिपूरमध्ये आजपासून इंटरनेट सेवा पूर्ववत होणार, राज्यातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 14:53 IST

मणिपूर राज्य सरकारने शनिवारी मोठा निर्णय घेतला असून अनेक महिन्यांपासून ठप्प असलेली इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे. 

अनेक महिन्यांपासून जातीय हिंसाचाराच्या आगीत धगधगत असलेल्या ईशान्येकडील राज्य मणिपूरमधील परिस्थिती आता सामान्य होताना दिसत आहे. येथील लोकांची दिनचर्या हळूहळू रुळावर येत आहे. अशा परिस्थितीत मणिपूरमधील सरकारी निर्बंधही शिथिल केले जात आहेत. दरम्यान, मणिपूर राज्य सरकारने शनिवारी मोठा निर्णय घेतला असून अनेक महिन्यांपासून ठप्प असलेली इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे. 

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यात मणिपूरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर राज्य सरकारने इंटरनेट सेवांवर बंदी घातली होती.दरम्यान, मणिपूरमध्ये बहुसंख्य मैतेई आणि अल्पसंख्याक कुकी जमातींमध्ये जातीय हिंसाचार झाला होता. यावेळी सरकारी यंत्रणा पूर्णपणे असहाय दिसून आली होती. याठिकाणी महिलांची नग्नावस्थेत धींड काढल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. जवळपास चार महिने दोन्ही समाजामध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तसेच, घरांची मोठ्याप्रमाणात जाळपोळ झाली होती. 

याचबरोबर, हिंसाचारादरम्यान सरकारी वाहने, कार्यालये जाळण्यात आली होती. तसेच पोलीस ठाण्यांना लक्ष्य करण्यात आले. या हिंसाचारात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो जखमी झाले. विशेष म्हणजे मणिपूरमध्ये केंद्रीय सुरक्षा दल तैनात असूनही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. दरम्यान, आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राज्यातील प्रज्ञावंतांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील इंटरनेट सेवा पूर्ववत होणे हा जनतेसाठी मोठ्या दिलासापेक्षा कमी नाही.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारInternetइंटरनेट