शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये आजपासून इंटरनेट सेवा पूर्ववत होणार, राज्यातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 14:53 IST

मणिपूर राज्य सरकारने शनिवारी मोठा निर्णय घेतला असून अनेक महिन्यांपासून ठप्प असलेली इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे. 

अनेक महिन्यांपासून जातीय हिंसाचाराच्या आगीत धगधगत असलेल्या ईशान्येकडील राज्य मणिपूरमधील परिस्थिती आता सामान्य होताना दिसत आहे. येथील लोकांची दिनचर्या हळूहळू रुळावर येत आहे. अशा परिस्थितीत मणिपूरमधील सरकारी निर्बंधही शिथिल केले जात आहेत. दरम्यान, मणिपूर राज्य सरकारने शनिवारी मोठा निर्णय घेतला असून अनेक महिन्यांपासून ठप्प असलेली इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे. 

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यात मणिपूरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर राज्य सरकारने इंटरनेट सेवांवर बंदी घातली होती.दरम्यान, मणिपूरमध्ये बहुसंख्य मैतेई आणि अल्पसंख्याक कुकी जमातींमध्ये जातीय हिंसाचार झाला होता. यावेळी सरकारी यंत्रणा पूर्णपणे असहाय दिसून आली होती. याठिकाणी महिलांची नग्नावस्थेत धींड काढल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. जवळपास चार महिने दोन्ही समाजामध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तसेच, घरांची मोठ्याप्रमाणात जाळपोळ झाली होती. 

याचबरोबर, हिंसाचारादरम्यान सरकारी वाहने, कार्यालये जाळण्यात आली होती. तसेच पोलीस ठाण्यांना लक्ष्य करण्यात आले. या हिंसाचारात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो जखमी झाले. विशेष म्हणजे मणिपूरमध्ये केंद्रीय सुरक्षा दल तैनात असूनही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. दरम्यान, आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राज्यातील प्रज्ञावंतांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील इंटरनेट सेवा पूर्ववत होणे हा जनतेसाठी मोठ्या दिलासापेक्षा कमी नाही.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारInternetइंटरनेट