शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

मणिपूरमध्ये आजपासून इंटरनेट सेवा पूर्ववत होणार, राज्यातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 14:53 IST

मणिपूर राज्य सरकारने शनिवारी मोठा निर्णय घेतला असून अनेक महिन्यांपासून ठप्प असलेली इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे. 

अनेक महिन्यांपासून जातीय हिंसाचाराच्या आगीत धगधगत असलेल्या ईशान्येकडील राज्य मणिपूरमधील परिस्थिती आता सामान्य होताना दिसत आहे. येथील लोकांची दिनचर्या हळूहळू रुळावर येत आहे. अशा परिस्थितीत मणिपूरमधील सरकारी निर्बंधही शिथिल केले जात आहेत. दरम्यान, मणिपूर राज्य सरकारने शनिवारी मोठा निर्णय घेतला असून अनेक महिन्यांपासून ठप्प असलेली इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे. 

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यात मणिपूरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर राज्य सरकारने इंटरनेट सेवांवर बंदी घातली होती.दरम्यान, मणिपूरमध्ये बहुसंख्य मैतेई आणि अल्पसंख्याक कुकी जमातींमध्ये जातीय हिंसाचार झाला होता. यावेळी सरकारी यंत्रणा पूर्णपणे असहाय दिसून आली होती. याठिकाणी महिलांची नग्नावस्थेत धींड काढल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. जवळपास चार महिने दोन्ही समाजामध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तसेच, घरांची मोठ्याप्रमाणात जाळपोळ झाली होती. 

याचबरोबर, हिंसाचारादरम्यान सरकारी वाहने, कार्यालये जाळण्यात आली होती. तसेच पोलीस ठाण्यांना लक्ष्य करण्यात आले. या हिंसाचारात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो जखमी झाले. विशेष म्हणजे मणिपूरमध्ये केंद्रीय सुरक्षा दल तैनात असूनही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. दरम्यान, आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राज्यातील प्रज्ञावंतांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील इंटरनेट सेवा पूर्ववत होणे हा जनतेसाठी मोठ्या दिलासापेक्षा कमी नाही.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारInternetइंटरनेट