शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"तुमच्याकडे फक्त ७ दिवस आहेत...": मणिपूरमध्ये शस्त्रे लुटणाऱ्यांना राज्यपालांनी दिला अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 19:46 IST

मणिपूरमध्ये राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी लोकांना ७ दिवसांच्या आत लुटलेली शस्त्रे परत करण्याचे अल्टिमेटम दिले आहे.

Manipur President Rule: गेल्या दोन वर्षांपासून हिंसाचाराने धुमसणाऱ्या मणिपूरमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. मेईतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारामुळे मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर सर्व अधिकार हे राष्ट्रपतींकडे गेले. त्यानंतर राज्यपाल अजय कुमार भल्ला हे राज्याचे कार्यकारी प्रमुख बनले आहेत. त्यामुळे मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यपालांनी लोकांना लुटलेली शस्त्रे आणि दारूगोळा परत करण्याचे आवाहन केले आहे.

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी लोकांना ७ दिवसांच्या आत लुटलेली शस्त्रे परत करण्याचे अल्टिमेटम दिले आहे. राज्यपाल भल्ला यांनी गेल्या २० महिन्यांपासून राज्यात सुरू असलेला हिंसाचार पाहता सर्व समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी  तरुणांनी लुटलेली आणि बेकायदेशीररित्या ठेवलेली शस्त्रे आणि दारूगोळा स्वेच्छेने जवळच्या पोलीस स्टेशन, चौकी किंवा सुरक्षा दलाच्या छावणीत येत्या सात दिवसांत जमा करण्याचे आवाहन केले आहे. आठवडाभरात शस्त्रे परत केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन राज्यपालांनी दिले आहे. मात्र त्यानंतर अशी शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

"शांतता आणि सांप्रदायिक सलोख्यावर परिणाम करणाऱ्या अनेक दुर्दैवी घटनांमुळे गेल्या २० महिन्यांपासून खोरे आणि डोंगराळ दोन्ही भागातील मणिपूरच्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सामान्य स्थिती करण्यासाठी आणि राज्यातील सर्व समुदायांनी शत्रुत्व थांबवण्यासाठी आणि समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुढे आले पाहिजे, जेणेकरून लोक त्यांच्या सामान्य दैनंदिन व्यवहारात परत येऊ शकतील," असंही राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मणिपूरमधील मेतेई आणि कुकी समुदायांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून जातीय संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी ९ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पदांचा राजीनामा दिल्यापासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मणिपूरमध्ये काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर प्रतिबंधित दहशतवादी संघटनांकडून कोणतीही धाडसी घटना घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारPresident Ruleराष्ट्रपती राजवट