शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

"तुमच्याकडे फक्त ७ दिवस आहेत...": मणिपूरमध्ये शस्त्रे लुटणाऱ्यांना राज्यपालांनी दिला अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 19:46 IST

मणिपूरमध्ये राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी लोकांना ७ दिवसांच्या आत लुटलेली शस्त्रे परत करण्याचे अल्टिमेटम दिले आहे.

Manipur President Rule: गेल्या दोन वर्षांपासून हिंसाचाराने धुमसणाऱ्या मणिपूरमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. मेईतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारामुळे मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर सर्व अधिकार हे राष्ट्रपतींकडे गेले. त्यानंतर राज्यपाल अजय कुमार भल्ला हे राज्याचे कार्यकारी प्रमुख बनले आहेत. त्यामुळे मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यपालांनी लोकांना लुटलेली शस्त्रे आणि दारूगोळा परत करण्याचे आवाहन केले आहे.

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी लोकांना ७ दिवसांच्या आत लुटलेली शस्त्रे परत करण्याचे अल्टिमेटम दिले आहे. राज्यपाल भल्ला यांनी गेल्या २० महिन्यांपासून राज्यात सुरू असलेला हिंसाचार पाहता सर्व समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी  तरुणांनी लुटलेली आणि बेकायदेशीररित्या ठेवलेली शस्त्रे आणि दारूगोळा स्वेच्छेने जवळच्या पोलीस स्टेशन, चौकी किंवा सुरक्षा दलाच्या छावणीत येत्या सात दिवसांत जमा करण्याचे आवाहन केले आहे. आठवडाभरात शस्त्रे परत केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन राज्यपालांनी दिले आहे. मात्र त्यानंतर अशी शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

"शांतता आणि सांप्रदायिक सलोख्यावर परिणाम करणाऱ्या अनेक दुर्दैवी घटनांमुळे गेल्या २० महिन्यांपासून खोरे आणि डोंगराळ दोन्ही भागातील मणिपूरच्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सामान्य स्थिती करण्यासाठी आणि राज्यातील सर्व समुदायांनी शत्रुत्व थांबवण्यासाठी आणि समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुढे आले पाहिजे, जेणेकरून लोक त्यांच्या सामान्य दैनंदिन व्यवहारात परत येऊ शकतील," असंही राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मणिपूरमधील मेतेई आणि कुकी समुदायांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून जातीय संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी ९ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पदांचा राजीनामा दिल्यापासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मणिपूरमध्ये काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर प्रतिबंधित दहशतवादी संघटनांकडून कोणतीही धाडसी घटना घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारPresident Ruleराष्ट्रपती राजवट