शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

"तुमच्याकडे फक्त ७ दिवस आहेत...": मणिपूरमध्ये शस्त्रे लुटणाऱ्यांना राज्यपालांनी दिला अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 19:46 IST

मणिपूरमध्ये राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी लोकांना ७ दिवसांच्या आत लुटलेली शस्त्रे परत करण्याचे अल्टिमेटम दिले आहे.

Manipur President Rule: गेल्या दोन वर्षांपासून हिंसाचाराने धुमसणाऱ्या मणिपूरमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. मेईतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारामुळे मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर सर्व अधिकार हे राष्ट्रपतींकडे गेले. त्यानंतर राज्यपाल अजय कुमार भल्ला हे राज्याचे कार्यकारी प्रमुख बनले आहेत. त्यामुळे मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यपालांनी लोकांना लुटलेली शस्त्रे आणि दारूगोळा परत करण्याचे आवाहन केले आहे.

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी लोकांना ७ दिवसांच्या आत लुटलेली शस्त्रे परत करण्याचे अल्टिमेटम दिले आहे. राज्यपाल भल्ला यांनी गेल्या २० महिन्यांपासून राज्यात सुरू असलेला हिंसाचार पाहता सर्व समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी  तरुणांनी लुटलेली आणि बेकायदेशीररित्या ठेवलेली शस्त्रे आणि दारूगोळा स्वेच्छेने जवळच्या पोलीस स्टेशन, चौकी किंवा सुरक्षा दलाच्या छावणीत येत्या सात दिवसांत जमा करण्याचे आवाहन केले आहे. आठवडाभरात शस्त्रे परत केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन राज्यपालांनी दिले आहे. मात्र त्यानंतर अशी शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

"शांतता आणि सांप्रदायिक सलोख्यावर परिणाम करणाऱ्या अनेक दुर्दैवी घटनांमुळे गेल्या २० महिन्यांपासून खोरे आणि डोंगराळ दोन्ही भागातील मणिपूरच्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सामान्य स्थिती करण्यासाठी आणि राज्यातील सर्व समुदायांनी शत्रुत्व थांबवण्यासाठी आणि समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुढे आले पाहिजे, जेणेकरून लोक त्यांच्या सामान्य दैनंदिन व्यवहारात परत येऊ शकतील," असंही राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मणिपूरमधील मेतेई आणि कुकी समुदायांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून जातीय संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी ९ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पदांचा राजीनामा दिल्यापासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मणिपूरमध्ये काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर प्रतिबंधित दहशतवादी संघटनांकडून कोणतीही धाडसी घटना घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारPresident Ruleराष्ट्रपती राजवट