शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

"आम्हाला जे विषारी फळ खावे लागत आहे, त्याचे बीज काँग्रेसने पेरले होते", मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 10:50 IST

आम्हाला जे विषारी फळ खावे लागत आहे, त्याचे बीज विरोधी पक्षानेच पेरले होते, असे म्हणत एन बिरेन सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

इंफाळ : मणिपुरमध्ये गेल्या काही दिवसापासून हिंसाचार सुरू आहे. दरम्यान, राज्यातील जातीय हिंसाचाराच्या कारणांबद्दल आपण सुद्धा संभ्रमात आहोत. आमच्या सरकारने मेतेई समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा की नाही, याबाबत कोणतीही शिफारस केलेली नाही. याचे उत्तर एकता रॅली काढणाऱ्यांकडे आहे. यानंतरच राज्यात हिंसाचार उसळला, असे मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी शनिवारी सांगितले.

याचबरोबर, आम्हाला जे विषारी फळ खावे लागत आहे, त्याचे बीज विरोधी पक्षानेच पेरले होते, असे म्हणत एन बिरेन सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "उच्च न्यायालयाने आम्हाला सांगितले होते.. माझ्या सरकारने अद्याप मेतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची शिफारस केलेली नाही. त्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे हिंसा का होत आहे, हे मला कळत नाही. मेतेई समाजाला एसटीचा दर्जा देण्याच्या विरोधात ज्या संघटनांनी एकता रॅली काढली, त्यांनी जगाला सांगायला हवे. त्याच्याकडे उत्तर आहे."

मणिपूरमधील परिस्थिती 7-10 दिवसांत सुधारेल - हिमंता बिस्वा सरमावृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या मणिपूरमधील परिस्थिती 7-10 दिवसांत सुधारेल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी सांगितले. तसेच, राज्य आणि केंद्र सरकार शांतता प्रस्थापित करण्यासाठी 'शांतपणे' काम करत आहेत. पूर्वीपेक्षा परिस्थिती शांत असताना काँग्रेस आपली चिंता व्यक्त करत आहे, असेही आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेस