शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

"आम्हाला जे विषारी फळ खावे लागत आहे, त्याचे बीज काँग्रेसने पेरले होते", मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 10:50 IST

आम्हाला जे विषारी फळ खावे लागत आहे, त्याचे बीज विरोधी पक्षानेच पेरले होते, असे म्हणत एन बिरेन सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

इंफाळ : मणिपुरमध्ये गेल्या काही दिवसापासून हिंसाचार सुरू आहे. दरम्यान, राज्यातील जातीय हिंसाचाराच्या कारणांबद्दल आपण सुद्धा संभ्रमात आहोत. आमच्या सरकारने मेतेई समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा की नाही, याबाबत कोणतीही शिफारस केलेली नाही. याचे उत्तर एकता रॅली काढणाऱ्यांकडे आहे. यानंतरच राज्यात हिंसाचार उसळला, असे मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी शनिवारी सांगितले.

याचबरोबर, आम्हाला जे विषारी फळ खावे लागत आहे, त्याचे बीज विरोधी पक्षानेच पेरले होते, असे म्हणत एन बिरेन सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "उच्च न्यायालयाने आम्हाला सांगितले होते.. माझ्या सरकारने अद्याप मेतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची शिफारस केलेली नाही. त्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे हिंसा का होत आहे, हे मला कळत नाही. मेतेई समाजाला एसटीचा दर्जा देण्याच्या विरोधात ज्या संघटनांनी एकता रॅली काढली, त्यांनी जगाला सांगायला हवे. त्याच्याकडे उत्तर आहे."

मणिपूरमधील परिस्थिती 7-10 दिवसांत सुधारेल - हिमंता बिस्वा सरमावृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या मणिपूरमधील परिस्थिती 7-10 दिवसांत सुधारेल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी सांगितले. तसेच, राज्य आणि केंद्र सरकार शांतता प्रस्थापित करण्यासाठी 'शांतपणे' काम करत आहेत. पूर्वीपेक्षा परिस्थिती शांत असताना काँग्रेस आपली चिंता व्यक्त करत आहे, असेही आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेस