शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

"आम्हाला जे विषारी फळ खावे लागत आहे, त्याचे बीज काँग्रेसने पेरले होते", मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 10:50 IST

आम्हाला जे विषारी फळ खावे लागत आहे, त्याचे बीज विरोधी पक्षानेच पेरले होते, असे म्हणत एन बिरेन सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

इंफाळ : मणिपुरमध्ये गेल्या काही दिवसापासून हिंसाचार सुरू आहे. दरम्यान, राज्यातील जातीय हिंसाचाराच्या कारणांबद्दल आपण सुद्धा संभ्रमात आहोत. आमच्या सरकारने मेतेई समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा की नाही, याबाबत कोणतीही शिफारस केलेली नाही. याचे उत्तर एकता रॅली काढणाऱ्यांकडे आहे. यानंतरच राज्यात हिंसाचार उसळला, असे मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी शनिवारी सांगितले.

याचबरोबर, आम्हाला जे विषारी फळ खावे लागत आहे, त्याचे बीज विरोधी पक्षानेच पेरले होते, असे म्हणत एन बिरेन सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "उच्च न्यायालयाने आम्हाला सांगितले होते.. माझ्या सरकारने अद्याप मेतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची शिफारस केलेली नाही. त्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे हिंसा का होत आहे, हे मला कळत नाही. मेतेई समाजाला एसटीचा दर्जा देण्याच्या विरोधात ज्या संघटनांनी एकता रॅली काढली, त्यांनी जगाला सांगायला हवे. त्याच्याकडे उत्तर आहे."

मणिपूरमधील परिस्थिती 7-10 दिवसांत सुधारेल - हिमंता बिस्वा सरमावृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या मणिपूरमधील परिस्थिती 7-10 दिवसांत सुधारेल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी सांगितले. तसेच, राज्य आणि केंद्र सरकार शांतता प्रस्थापित करण्यासाठी 'शांतपणे' काम करत आहेत. पूर्वीपेक्षा परिस्थिती शांत असताना काँग्रेस आपली चिंता व्यक्त करत आहे, असेही आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेस