मनपाला करावी लागेल पाणीकपात ढिसाळ नियोजन: टाकळी योजनेत शेवटचे पाणी
By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:48+5:302015-09-03T23:05:48+5:30
सोलापूर : पावसाची अशीच स्थिती राहिली तर औज बंधार्यात हे शेवटचे पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे महापालिकेला पाणीपुरवठय़ात कपातीचे धोरण राबविणे गरजेचे ठरणार आहे.

मनपाला करावी लागेल पाणीकपात ढिसाळ नियोजन: टाकळी योजनेत शेवटचे पाणी
स लापूर : पावसाची अशीच स्थिती राहिली तर औज बंधार्यात हे शेवटचे पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे महापालिकेला पाणीपुरवठय़ात कपातीचे धोरण राबविणे गरजेचे ठरणार आहे. गुरूवारी मंत्रालयात औज बंधार्यासाठी उजनीतून पाणी सोडण्याबाबत चर्चा झाली. उजनी धरणातील पाणीसाठा पाहता पाटबंधारे खात्याला सोलापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी नदीतून पाणी सोडणे परवडणार नाही. अर्धा टीएमसी पाण्यासाठी साडेचार टीएमसी पाणी नदीत सोडावे लागते. त्यामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी मोठय़ा प्रमाणावर खालावत आहे. सध्याची पातळी पाहता आता पुढील काळात भीमेत पाणी सोडणे शक्य होणार नाही. त्यामुळे महापालिकेला उपलब्ध पाणीसाठय़ावरून शहराचे पाणी नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे. उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधार्यात पोहोचण्यास आठ दिवस लागणार आहेत. सध्या औज बंधार्याची पातळी 1 मीटरवर आली असून, आठवडाभर पाणी पुरणार आहे. उजनीतून 14 सप्टेंबर रोजी पाणी सोडल्यास 22 सप्टेंबरपर्यंत औज बंधार्यात पाणी पोहोचेल. यादरम्यान पाण्याची काटकसर करावी लागणार आहे. याशिवाय औज बंधार्यात साठविलेले पाणी 45 दिवस पुरते असे पाटबंधारे खात्याचे मत आहे. पण महापालिकेने चौथा पंप सुरू केल्याने महिनाभर पाणी पुरत आहे. अशा परिस्थितीत पाणीपुरवठा विभागाला आता पाणी कपातीशिवाय पर्याय राहिलेला नाही. कोट..पाणीसाठय़ांची स्थिती पाहता आता कठोर पावले उचलल्याशिवाय पर्याय नाही. उजनीतून पाणी सोडल्यावर किती दिवसात औज बंधार्यात येईल, त्यावरून पुढील पाणी नियोजन ठरविले जाईल. तूर्त गणेशोत्सवाची काळजी मिटली आहे. विजयकुमार काळम-पाटीलआयुक्त, महापालिका000इन्फो..नवीन योजनेची गरजटाकळी योजनेसाठी पाणी सोडणे पाटबंधारे खात्याला परवडत नाही. महापालिकेला प्राप्त स्थितीत उजनीहून सहाशे कोटी खर्चाची नवीन दुहेरी जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सभागृहाने गेल्या महिन्याच्या सभेत एकमताने ठराव करून या योजनेला मंजुरी दिली आहे. आता शासनाकडे पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून सहा महिन्यात काम मार्गी लावण्याचे महापालिकेसमोर आव्हान आहे.