शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? अंत्यसंस्कार झाले, पिंडदानही केलं अन् १० दिवसांनी 'तो' जिवंत परतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 11:26 IST

मृत व्यक्ती १० दिवसांनी जिवंत परतला; शोकसागरात बुडालेल्या कुटुंबाला आश्चर्याचा धक्का

राजसमंद: पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे एका कुटुंबाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. दहा दिवसांपूर्वी पोलिसांनी ओंकारलाल यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला. ओंकारलाल यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांनी ओंकारलाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. पिंडदानदेखील करण्यात आलं. मात्र तेच ओंकारलाल १० दिवसांनी जिवंत परतले. त्यामुळे कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. राजस्थानच्या राजसमंदमध्ये ही घटना घडली.माहेरी जाताना नवऱ्याला बाईक थांबवायला सांगितली, सासू अन् मुलीसमोर नदीत उडी घेतली; अन्...पोलिसांना ११ मे रोजी मोही रोडवर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी रुग्णवाहिकेतून तो आर. के. जिल्हा रुग्णालयात नेला. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं कांकरोली पोलिसांना पत्र पाठवून मृतदेहाची ओळख पटवण्यास सांगितलं. मात्र काहीच माहिती हाती लागली नाही. यानंतर १५ मे रोजी मुख्य हवालदार मोहनलाल रुग्णालयात पोहोचले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोच्या आधारे त्यांनी कांकरोलीतील विवेकानंद चौकात राहणारे ओंकारलालचे बंधू नानालाल आणि त्यांच्या कुटुंबियांना बोलावून घेतलं.भयावह! ५ महिने, ६ शस्त्रक्रिया, ३९ इंजेक्शन्स; उपचारांसाठी घरही विकलं; तरीही ब्लॅक फंगस पाठ सोडेनाभाऊ ओंकारलालच्या उजव्या हाताच्या मनगटापासून कोपरापर्यंत जखमेची खूण आहे. डाव्या हाताची दोन बोटं वळलेली असल्याचं नानालाल यांनी पोलिसांना सांगितलं. मात्र रुग्णालयात असलेला मृतदेह ओंकारलालचाच असल्याचं पोलिसांनी ठामपणे सांगितलं. मृतदेह ३ दिवसांपासून शवागारात असल्यानं हातावरील खूण दिसत नसल्याचं सांगत पोलिसांनी शवविच्छेदन न करताच मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला.ओंकारलालच्या मुलानं मुंडण करून १५ मे रोजी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतरचे सर्व विधीदेखील पूर्ण करण्यात आले. कुटुंब शोकसागरात बुडालं असताना अचानक २३ मे रोजी ओंकारलाल घरी पोहोचल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आपण कुटुंबातील कोणालाच न सांगता ११ मे रोजी उदयपूरला गेलो होतो असं ओंकारलाल यांनी सांगितलं. तिथे प्रकृती बिघडल्यानं ४ दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. यानंतर पैसे संपल्यानं ओंकारलाल ६ दिवस उदयपूरमध्येच भटकत होते.