शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मी जिवंत आहे... हे सिद्ध करण्यासाठी 'त्याला' करावी लागतेय धडपड; माराव्या लागताहेत कार्यालयाच्या चकरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 14:25 IST

Madhya Pradesh News : एका व्यक्तीला सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वारंवार सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत. कारण सरकारी कागदपत्रांवर त्याला मृत घोषित करण्यात आलं आहे. 

नवी दिल्ली - चित्रपटात अनेकदा एखाद्या जिवंत माणसाला मृत घोषित करून अथवा त्याचा मृत्यू झाला हे दाखवून त्याची जमीन बळाकावली जाते, त्याचा पैसा लुटला जातो. तसेच काही वेळा महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून एखादी व्यक्ती अस्तित्वात असतानाही तिला मृत दाखवलं जातं. अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. एका व्यक्तीला आपणं जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. अशोक नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीला सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वारंवार सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत. कारण सरकारी कागदपत्रांवर त्याला मृत घोषित करण्यात आलं आहे. 

शिवकुमार अहिरवार असं या व्यक्तीचं नाव असून तो गेल्या दोन महिन्यांपासून अधिकाऱ्यांकडे जाऊन आपण जिवंत असल्याचं वारंवार सांगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मजुरीचं काम करणाऱ्या शिवकुमारने 2018 साली राज्य सरकारच्या मुख्यमंत्री जन कल्याण संबल योजनेत आपले नाव नोंदवले होते. या योजनेद्वारा सरकार असंघटित क्षेत्राच्या उन्नतीसाठी आर्थिक मदत करते. या योजनेद्वारा मुलांच्या पालन-पोषणासाठी, मृत्यूनंतर आर्थिक सहाय्य करते.

शिवकुमारला या योजनेमधून 2018 साली मुलगा झाल्यानंतर 18 हजार रुपये मिळाले होते. पण या वर्षी मार्च महिन्यात मुलगी जन्माला आल्यानंतर तो सरकारी कार्यालयात गेला तेव्हा त्याला कागदपत्रांवर मृत घोषित केलं असल्याचे समजले. सरकारी नोंदींमध्ये 2019 साली त्याला मृत घोषित करण्यात आलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असे शिवकुमारने सांगितले. त्यानंतर त्याने तिथे उपस्थित असलेल्या लोकांना आपण जिवंत असल्याचे समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणीही त्याचे ऐकले नाही. ही चूक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुरुस्त करावी लागेल त्यानंतर योजनेचा लाभ मिळू शकतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिवकुमारने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर गावातल्या सरपंचाकडून आपण जिवंत असल्याचे एका कागदावर लिहून घेतले आहे. शिवकुमारचे नाव नोंदणीमधून हटवण्याच्या एका पत्रात त्याच्या मृत्यू झाल्याचा एक कागद मार्च 2018 मध्ये ग्रामपंचायत सचिवांना मिळाला होता. त्याला मे 2018 मध्ये ग्राम योजना सहाय्यक संतोष राव यांची मंजुरी मिळाली होती. ऑक्टोबर 2019 मध्ये गौरव लोधी या लिपीकाने ही माहिती पुढे पाठवली. शिवकुमारला गेल्या वर्षी संतोष राव भेटले होते. मृत झाल्यानंतरचे पैसे हवे आहेत का अशी विचारणा त्यांनी केली होती. मृत घोषित केल्यानंतर सरकारकडून 2 लाख मिळतील. त्यातील अर्धे रक्कम तुला मिळेल असे संतोष राव यांनी सांगितल्याचे शिवकुमारने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

ऑक्टोबर 2019 मध्ये लाभार्थ्यांचे शारीरिक तपासणी केली जात होती तेव्हा लिपीकाकडून झालेल्या एका चूकीमुळे शिवकुमारला मृत घोषित करण्यात आले असे उपविभागीय दंडाधिकारी देवेंद्र सिंह यांनी सांगितले. तसेच यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चौकशी करण्यात येईल असे ते म्हणाले. शनिवारी चंदेरी येथील अधिकाऱ्याने त्या लिपीकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अशोक नगरचे जिल्हाधिकारी अभय वर्मा यांनी ही चूक सुधारण्यात येत असल्याचे सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारतDeathमृत्यू