शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

प्रेमासाठी कायपण; गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी 'त्याने' केलं तिच्या पुतण्याचंच अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 1:12 PM

२४ तासांमध्ये अपहरण झालेल्या मुलाची सुटका

आधी अपहरण, मग केली जाणारी पैशांची मागणी, अशा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र तेलंगणातील एका कुटुंबाकडे अपहरण करण्यात आलेल्या मुलाच्या सुटकेसाठी एक अजब मागणी करण्यात आली. मुलगा सुखरुप हवा असेल, तर माझ्या प्रेमात आडवे येऊ नका. माझी गर्लफ्रेंड मला हवी आहे, अशी मागणी अपहरणकर्त्याने कुटुंबाकडे केली. या अपहरणकर्त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याने त्याच्या प्रेयसीसाठी हा संपूर्ण प्रकार केल्याची कबुली दिली आहे. या आरोपीला पोलिसांनी पुण्यातून अटक केली. तेलंगणातील वानपर्ती जिल्ह्यातील कोथाकोटामधून आठ वर्षांच्या चंद्रू नायकचे ७ एप्रिल रोजी शाळेतून अपहरण झाले होते. महबूबनगरमध्ये राहणाऱ्या २३ वर्षांच्या वामसी कृष्णने चंद्रूचे अपहरण केले. अपहरण केलेल्या चंद्रूच्या आत्येसोबत वामसीचे प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या घरी याबद्दलची कुणकुण लागताच त्यांनी वामसीला मारहाण केली आणि पुन्हा जवळपास दिसू नकोस, अशी  धमकीदेखील दिली. त्यामुळे प्रेयसीच्या कुटुंबीयांना धडा शिकवण्यासाठी आणि दुरावलेले प्रेम परत मिळवण्यासाठी चंद्रूचे अपहरण केले. यानंतर वामसीने कोथाकोटा बस स्थानकातून चंद्रूच्या घरी फोन करुन अपहरण झाल्याची माहिती दिली. 'चंद्रू सुखरुप हवा असेल, तर माझ्या गर्लफ्रेंडला माझ्याकडे पाठवा,' अशी धमकीच वामसीने चंद्रूच्या कुटुंबीयांना दिली. वामसीने अनेकदा फोन करुन पीडित कुटुंबाला त्रास दिला. यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी एक विशेष पथक तयार करुन वामसीचा पाठलाग सुरु केला. आरोपी रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर वामसी पुणे स्थानकात उतरताच पोलिसांनी त्याला अटक केली आणि अपहृत मुलाची सुटका केली.  

टॅग्स :Kidnappingअपहरण