शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जींनी ट्रॅक बदलला! सॉफ्ट हिंदुत्वाच्या दिशेने सुरु केला प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 13:27 IST

पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागामध्ये भाजपाने पक्षविस्तार सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा आपल्या राजकीय रणनितीमध्ये बदल करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे. 26 डिसेंबरला ममता बॅनर्जी गंगासागरला गेल्या होत्या, तिथे त्या तासभर कपिलमुनींच्या आश्रमात थांबल्या होत्या.ममता बॅनर्जी यांच्यावर अल्पसंख्यांकांच्या तृष्टीकरणाचा आरोप होत आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागामध्ये भाजपाने पक्षविस्तार सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा आपल्या राजकीय रणनितीमध्ये बदल करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मागच्या काही काळात ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या काही निर्णयांवरुन त्या हिंदुत्वाच्या विरोधात असल्याची त्यांची प्रतिमा भाजपाने तयार केली आहे. हीच प्रतिमा बदलण्याचा ममता बॅनर्जींनी प्रयत्न सुरु केला आहे. 

आपण हिंदुंच्या विरोधात नाही. सहिष्णू हिंदू आहोत हा संदेश देण्याचा ममता बॅनर्जी प्रयत्न करत आहेत. 26 डिसेंबरला ममता बॅनर्जी गंगासागरला गेल्या होत्या. तिथे त्या तासभर कपिलमुनींच्या आश्रमात थांबल्या होत्या. मुख्य पूजारी ग्यानदासजी यांच्याबरोबर त्यांनी तासभर चर्चा केली. ममता बॅनर्जींच्या या गंगासागर भेटीकडे विश्लेषक राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. 

गंगासागरमधून गंगा नदी वाहते. येत्या 14 जानेवारीला मकरसंक्रातीला लाखो लोक पवित्र स्नानासाठी इथे येतात. मी पुन्हा गंगासागरला येईन असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर अल्पसंख्यांकांच्या तृष्टीकरणाचा आरोप होत आहे. त्याचमुळे संतुलन साधण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्याकडून आता असे प्रयत्न होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. 

बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या मताधिक्क्यामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली. साबांग आणि डाकक्षीन कांथी येथे पक्ष संघटना नसतानाही भाजपाला ब-यापैकी मते मिळाली. साबांग विधानसभा निवडणुकीत 2016 मध्ये तृणमुल काँग्रेसला 1 लाख 6 हजाराहून जास्त मते मिळाली होती. त्यावेळी भाजपाला फक्त 5610 मते होती. पण पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराला 37 हजार 476 मते मिळाली. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी रणनिती बदलल्याची चर्चा आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा लावला होता. काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्वाची दिशा पकडल्याचा संदेश त्यातून गेला आणि त्याचा फायदा काँग्रेसच्या जागा वाढण्यामध्ये झाला. त्यामुळे ममता बॅनर्जी आता त्याच दिशेने जात आहेत.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी