शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

ममता बॅनर्जींनी ट्रॅक बदलला! सॉफ्ट हिंदुत्वाच्या दिशेने सुरु केला प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 13:27 IST

पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागामध्ये भाजपाने पक्षविस्तार सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा आपल्या राजकीय रणनितीमध्ये बदल करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे. 26 डिसेंबरला ममता बॅनर्जी गंगासागरला गेल्या होत्या, तिथे त्या तासभर कपिलमुनींच्या आश्रमात थांबल्या होत्या.ममता बॅनर्जी यांच्यावर अल्पसंख्यांकांच्या तृष्टीकरणाचा आरोप होत आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागामध्ये भाजपाने पक्षविस्तार सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा आपल्या राजकीय रणनितीमध्ये बदल करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मागच्या काही काळात ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या काही निर्णयांवरुन त्या हिंदुत्वाच्या विरोधात असल्याची त्यांची प्रतिमा भाजपाने तयार केली आहे. हीच प्रतिमा बदलण्याचा ममता बॅनर्जींनी प्रयत्न सुरु केला आहे. 

आपण हिंदुंच्या विरोधात नाही. सहिष्णू हिंदू आहोत हा संदेश देण्याचा ममता बॅनर्जी प्रयत्न करत आहेत. 26 डिसेंबरला ममता बॅनर्जी गंगासागरला गेल्या होत्या. तिथे त्या तासभर कपिलमुनींच्या आश्रमात थांबल्या होत्या. मुख्य पूजारी ग्यानदासजी यांच्याबरोबर त्यांनी तासभर चर्चा केली. ममता बॅनर्जींच्या या गंगासागर भेटीकडे विश्लेषक राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. 

गंगासागरमधून गंगा नदी वाहते. येत्या 14 जानेवारीला मकरसंक्रातीला लाखो लोक पवित्र स्नानासाठी इथे येतात. मी पुन्हा गंगासागरला येईन असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर अल्पसंख्यांकांच्या तृष्टीकरणाचा आरोप होत आहे. त्याचमुळे संतुलन साधण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्याकडून आता असे प्रयत्न होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. 

बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या मताधिक्क्यामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली. साबांग आणि डाकक्षीन कांथी येथे पक्ष संघटना नसतानाही भाजपाला ब-यापैकी मते मिळाली. साबांग विधानसभा निवडणुकीत 2016 मध्ये तृणमुल काँग्रेसला 1 लाख 6 हजाराहून जास्त मते मिळाली होती. त्यावेळी भाजपाला फक्त 5610 मते होती. पण पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराला 37 हजार 476 मते मिळाली. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी रणनिती बदलल्याची चर्चा आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा लावला होता. काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्वाची दिशा पकडल्याचा संदेश त्यातून गेला आणि त्याचा फायदा काँग्रेसच्या जागा वाढण्यामध्ये झाला. त्यामुळे ममता बॅनर्जी आता त्याच दिशेने जात आहेत.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी