शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

ममता यांनी दिली थेट मोदी-शहांना टक्कर; विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये ठरल्या अग्रेसर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 13:14 IST

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला टार्गेट केल्याने अन्य विरोधी पक्ष त्यांच्यासोबत आले आहेत. अखिलेश यादव, तेजस्वी यादव, केसीआर, चंद्राबाबू नायडू अशा नेत्यांनी ट्विट करत ममता यांना पाठिंबा दिला आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यातील प्रचाराला रंगत आली असताना सर्व देशाचं लक्ष्य पश्चिम बंगालमधील होणाऱ्या राजकारणाकडे लागलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना टक्कर दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपाला पश्चिम बंगालमधील कडवी लढत दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राड्यानंतर मायावतीपासून राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेत्यांनीही ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निवडणुका संपल्यानंतर भविष्यात गरज पडलीस तर विरोधी पक्ष ममता बॅनर्जी यांच्यामागे उभे राहण्याचे संकेत मिळेत आहेत. 

कोलकाता येथे अमित शहा यांच्या रोड शोमध्ये हिंसाचार घडला त्यानंतर निवडणूक आयोगानेही कडक कारवाई करत पश्चिम बंगालमधील प्रचारावर एक दिवस आधीच बंदी आणली. गुरुवारी रात्री 10 पर्यंत निवडणुकीचा प्रचार करता येईल असे निवडणूक आयोगाने आदेश दिले. ज्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भाजपाला आणि निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलं. 

ममता यांच्यामागे उभा राहिला विरोधी पक्षममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला टार्गेट केल्याने अन्य विरोधी पक्ष त्यांच्यासोबत आले आहेत. अखिलेश यादव, तेजस्वी यादव, केसीआर, चंद्राबाबू नायडू अशा नेत्यांनी ट्विट करत ममता यांना पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेस, मायावतींनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालमध्ये 2 सभा असल्यानेच निवडणूक आयोगाने रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्यास मुभा दिल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. 

ममता बॅनर्जी यांनीही विरोधी पक्षातील नेत्यांचे ट्विट करत आभार व्यक्त केले आहेत. त्यामुळे निवडणूक निकालांपूर्वी विरोधी पक्ष पश्चिम बंगालमधील राड्यानंतर एकत्र झाला. ते भाजपासाठी चिंतीत करणारे आहे. पश्चिम बंगालमधील ही घटना विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी यांना स्पर्धेत अग्रेसर करत आहे. 

मागील काही महिन्यांपूर्वीही ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणलं होतं. त्यामुळे विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात ममता बॅनर्जी यांच्यासाठी पश्चिम बंगालमधील राडा महत्त्वपूर्ण ठरला आहे. 

   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीAkhilesh Yadavअखिलेश यादवRahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी