शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
4
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
5
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
6
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
7
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
8
शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट
9
सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
10
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
11
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
12
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
13
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
14
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
15
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
16
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
17
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
18
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
19
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
20
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ममता यांनी दिली थेट मोदी-शहांना टक्कर; विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये ठरल्या अग्रेसर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 13:14 IST

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला टार्गेट केल्याने अन्य विरोधी पक्ष त्यांच्यासोबत आले आहेत. अखिलेश यादव, तेजस्वी यादव, केसीआर, चंद्राबाबू नायडू अशा नेत्यांनी ट्विट करत ममता यांना पाठिंबा दिला आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यातील प्रचाराला रंगत आली असताना सर्व देशाचं लक्ष्य पश्चिम बंगालमधील होणाऱ्या राजकारणाकडे लागलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना टक्कर दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपाला पश्चिम बंगालमधील कडवी लढत दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राड्यानंतर मायावतीपासून राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेत्यांनीही ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निवडणुका संपल्यानंतर भविष्यात गरज पडलीस तर विरोधी पक्ष ममता बॅनर्जी यांच्यामागे उभे राहण्याचे संकेत मिळेत आहेत. 

कोलकाता येथे अमित शहा यांच्या रोड शोमध्ये हिंसाचार घडला त्यानंतर निवडणूक आयोगानेही कडक कारवाई करत पश्चिम बंगालमधील प्रचारावर एक दिवस आधीच बंदी आणली. गुरुवारी रात्री 10 पर्यंत निवडणुकीचा प्रचार करता येईल असे निवडणूक आयोगाने आदेश दिले. ज्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भाजपाला आणि निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलं. 

ममता यांच्यामागे उभा राहिला विरोधी पक्षममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला टार्गेट केल्याने अन्य विरोधी पक्ष त्यांच्यासोबत आले आहेत. अखिलेश यादव, तेजस्वी यादव, केसीआर, चंद्राबाबू नायडू अशा नेत्यांनी ट्विट करत ममता यांना पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेस, मायावतींनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालमध्ये 2 सभा असल्यानेच निवडणूक आयोगाने रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्यास मुभा दिल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. 

ममता बॅनर्जी यांनीही विरोधी पक्षातील नेत्यांचे ट्विट करत आभार व्यक्त केले आहेत. त्यामुळे निवडणूक निकालांपूर्वी विरोधी पक्ष पश्चिम बंगालमधील राड्यानंतर एकत्र झाला. ते भाजपासाठी चिंतीत करणारे आहे. पश्चिम बंगालमधील ही घटना विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी यांना स्पर्धेत अग्रेसर करत आहे. 

मागील काही महिन्यांपूर्वीही ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणलं होतं. त्यामुळे विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात ममता बॅनर्जी यांच्यासाठी पश्चिम बंगालमधील राडा महत्त्वपूर्ण ठरला आहे. 

   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीAkhilesh Yadavअखिलेश यादवRahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी