शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

ममतांनी साथ सोडली, नितीश कुमार गेले; ‘इंडिया’चे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 06:52 IST

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत सध्या सर्वकाही व्यवस्थित असल्याचे दिसत नाही. सुरुवातीला तृणमूलने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा आणि त्यापाठोपाठ नितीश कुमार यांनी ‘एनडीए’शी हातमिळवणी केली.

नवी दिल्ली - विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत सध्या सर्वकाही व्यवस्थित असल्याचे दिसत नाही. सुरुवातीला तृणमूलने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा आणि त्यापाठोपाठ नितीश कुमार यांनी ‘एनडीए’शी हातमिळवणी केली. २८ पक्ष असलेल्या ‘इंडिया’तील दोन प्रमुख पक्ष गेल्याने २६ घटक पक्ष राहिले आहेत. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही.  त्यामुळेच मोठ्या घटक पक्षांनी वेगळी भूमिका मांडल्याने ‘इंडिया’पुढील आव्हाने वाढली आहेत.

ममतांच्या स्वबळाच्या घोषणेचा कुणाला फायदा? बंगालमधील लोकसभेच्या ४२ पैकी गतवेळी तृणमूलने २२, काँग्रेसने २, भाजपने १८ जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत तृणमूल, काँग्रेस व डावे एकत्र आले असते, तर त्याचा फटका भाजपला बसला असता.मात्र, तृणमूलने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.कारण मागील निवडणुकीत भाजप २२ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यांना यावेळी तृणमूल व काँग्रेसमधील मतविभाजनाचा फायदा होऊ शकतो. 

अन्य राज्यांमध्ये जागावाटपाचा पेच बंगाल व बिहारवगळता अन्य राज्यांमध्ये ‘इंडिया’पुढील जागावाटपाचा पेच कायम आहे. पंजाबमध्ये आपसोबत, यूपीमध्ये समाजवादी पार्टी, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यासोबत, महाराष्ट्रात राष्ट्रवादी-शिवसेनासोबत काँग्रेसला जागावाटपाचा पेच सोडवावा लागणार आहे.

नितीश कुमार एनडीएत गेल्याचा परिणाम काय? - नितीश कुमार यांचा जदयु एनडीएत गेल्याने केवळ बिहारमध्येच नव्हे, तर देशात ‘इंडिया’ला फटका बसू शकतो.- जदयुने गत निवडणुकीवेळी देशातील ७ राज्यांमध्ये उमेदवार उतरविले होते. केवळ बिहारमध्ये विजय मिळविता आला असला, तरी लक्षद्वीप, मणिपूर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू- काश्मीर, पंजाबमध्ये बरीच मते मिळविली होती.- विशेषतः बिहार, यूपी व पंजाबमध्ये जदयुने भाजप उमेदवारांचे नुकसान केले होते; परंतु आता त्यांना फायदा होणार आहे.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा