शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

ममतांनी साथ सोडली, नितीश कुमार गेले; ‘इंडिया’चे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 06:52 IST

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत सध्या सर्वकाही व्यवस्थित असल्याचे दिसत नाही. सुरुवातीला तृणमूलने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा आणि त्यापाठोपाठ नितीश कुमार यांनी ‘एनडीए’शी हातमिळवणी केली.

नवी दिल्ली - विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत सध्या सर्वकाही व्यवस्थित असल्याचे दिसत नाही. सुरुवातीला तृणमूलने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा आणि त्यापाठोपाठ नितीश कुमार यांनी ‘एनडीए’शी हातमिळवणी केली. २८ पक्ष असलेल्या ‘इंडिया’तील दोन प्रमुख पक्ष गेल्याने २६ घटक पक्ष राहिले आहेत. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही.  त्यामुळेच मोठ्या घटक पक्षांनी वेगळी भूमिका मांडल्याने ‘इंडिया’पुढील आव्हाने वाढली आहेत.

ममतांच्या स्वबळाच्या घोषणेचा कुणाला फायदा? बंगालमधील लोकसभेच्या ४२ पैकी गतवेळी तृणमूलने २२, काँग्रेसने २, भाजपने १८ जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत तृणमूल, काँग्रेस व डावे एकत्र आले असते, तर त्याचा फटका भाजपला बसला असता.मात्र, तृणमूलने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.कारण मागील निवडणुकीत भाजप २२ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यांना यावेळी तृणमूल व काँग्रेसमधील मतविभाजनाचा फायदा होऊ शकतो. 

अन्य राज्यांमध्ये जागावाटपाचा पेच बंगाल व बिहारवगळता अन्य राज्यांमध्ये ‘इंडिया’पुढील जागावाटपाचा पेच कायम आहे. पंजाबमध्ये आपसोबत, यूपीमध्ये समाजवादी पार्टी, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यासोबत, महाराष्ट्रात राष्ट्रवादी-शिवसेनासोबत काँग्रेसला जागावाटपाचा पेच सोडवावा लागणार आहे.

नितीश कुमार एनडीएत गेल्याचा परिणाम काय? - नितीश कुमार यांचा जदयु एनडीएत गेल्याने केवळ बिहारमध्येच नव्हे, तर देशात ‘इंडिया’ला फटका बसू शकतो.- जदयुने गत निवडणुकीवेळी देशातील ७ राज्यांमध्ये उमेदवार उतरविले होते. केवळ बिहारमध्ये विजय मिळविता आला असला, तरी लक्षद्वीप, मणिपूर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू- काश्मीर, पंजाबमध्ये बरीच मते मिळविली होती.- विशेषतः बिहार, यूपी व पंजाबमध्ये जदयुने भाजप उमेदवारांचे नुकसान केले होते; परंतु आता त्यांना फायदा होणार आहे.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा