शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
2
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
3
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
4
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
5
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
6
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
7
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
8
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
9
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
10
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
11
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
12
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
13
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
14
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
15
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
16
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
17
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
18
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
19
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
20
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
Daily Top 2Weekly Top 5

SIR आडून NRC लागू करण्याचा कट, ममता बॅनर्जींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 00:17 IST

Mamata Banerjee News: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा बहाणा करूव निवडणूक आयोग एनआरसी लागू करण्याच प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

बिहारमध्ये मतदार याद्यांचे पुनरीक्षण झाल्यानंतर आता भारतीय निवडणूक आयोगाने देशभरात मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या पुनरीक्षणावरून राजकीय वातावरण तापू लागले आहेत. त्यातच राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा बहाणा करूव निवडणूक आयोग एनआरसी लागू करण्याच प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या अंतर्गत पश्चिम बंगालमधून सुमारे १ कोटी लोकांचं नाव मतदार यादींमधून हटवण्याची तयारी सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला. 

दरम्यान, दुसरीकडे निवडणूक उपायुक्त आणि निवडणूक आयोगाचे इतर अधिकारी पश्चिम बंगालमध्ये बैठका घेत आहेत. मात्र हे सारे काही भाजपाच्या इशाऱ्यावरून सुरू आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. एवढंच नाही तर त्यांनी निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी मनोज अग्रवाल यांच्यावरही टीका केली. मनोज अग्रवाल हे ओव्हररिअॅक्ट करत आहेत. अधिकाऱ्यांना धमकावले जात आहे. त्यांच्यावर अनेक आरोप आहेत, हे आरोप आम्ही योग्य वेळी उघड करू असा इशाराही ममता बॅनर्जी यांनी दिला.  

लोकांना विरोध करता येऊ नये यासाठी केंद्र सरकार जाणीवपूर्वक सणवारांच्या दिवसांत मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची प्रक्रिया सुरू करत आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाआडून एनआरसी लागू करण्याचा खेळ सुरू आहे, असा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला.    

English
हिंदी सारांश
Web Title : NRC plot via voter list revision: Mamata Banerjee accuses Election Commission.

Web Summary : Mamata Banerjee accuses the Election Commission and central government of plotting to implement NRC under the guise of voter list revision in West Bengal. She alleges deletion of names and accuses BJP of influencing the process during festival season. She criticizes election official Manoj Aggarwal, threatening to expose allegations against him.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग