शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगाल : 'मां किचन'मध्ये ५ रूपयांत पोटभर जेवण; भाजप म्हणतं,"हा तर राजकीय स्टंट"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 11:24 IST

West Bengal : ममता बॅनर्जींच्या 'मा किचनवरून' भाजपची ममता बॅनर्जींवर जोरदार टीका, त्या अपयशी ठरल्याचा केला दावा

ठळक मुद्देममता बॅनर्जींच्या 'मा किचनवरून' भाजपची ममता बॅनर्जींवर जोरदार टीकाममता बॅनर्जी अपयशी ठरल्याचा केला दावा

पुढील काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना काही ना काही आश्वासनं देण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच पश्चिम बंगालमध्येममता बॅनर्जी सरकारनं 'मां किचन' ही योजना सुरू केली आहे. यापूर्वीही कर्नाटकात इंदिरा कॅन्टिन आणि तामिळनाडून अम्मा कॅन्टिन अशा योजना सुरू करण्यात आल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या योजनेमध्ये गरीबांना ५ रूपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. थाळीत पाच रूपयांत भात, भाजी, डाळ आणि एक अंड देण्यात येईल. दरम्यान, भारतीय जनता पक्षानं हा निवडणुकीचा स्टंट असल्याचं म्हणत यावर टीका केली. परंतु यानंतर तृणमूल काँग्रेसनंही भाजपवर पलटवार करत निडणुकांच्या काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील राज्यात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू केल्याचं म्हटलं. "हे मां किचन आहे. आपल्याला सर्वांना आपल्या आईचा अभिमान आहे. ज्या ठिकाणी आई असेल त्या ठिकाणी सर्वकाही चांगलंच असेल. आपण सर्वच आपल्या आईला सलाम करतो," असं या योजनेच्या उद्धाटनावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी राज्यातील गरीब जनतेसाठी दुआरे सरकार (सरकार तुमच्या दरवाज्यावर) आणि आरोग्य साथी (आरोग्य विमा) अशा योजना सुरू केल्या. दरम्यान, मां किचन या योजनेवरून भाजपनं ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. "बंगालमधील लोकांकडे आपली भूक भागवण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळेत त्यांना मां किचन सुरू करावं लागलं आहे जेणेकरून लोकांना पाच रूपयांत जेवणं मिळेल, त्या अयशस्वी ठरल्याचं त्यांनी सिद्ध केलं आहे. लोकं भिकारी बनले आणि आणि त्यांना पाच रुपयांत जेवण द्यावं लागतं आहे," असं म्हणत पश्चिम बंगालचे भाजप प्रमुख दिलीप घोष यांनी निशाणा साधला. निवडणुकांच्याच वेळी दौरे का?"पंतप्रधान केवळ निवडणुकांच्या वेळीच या ठिकाणी एवढ्यांदा का येतात? ते या ठिकाणी केवळ प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी येतात. ती लोकं विनाकारण प्रश्न उपस्थित करत आहेत. ही कोणतीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली घोषणा नाही. कन्याश्री, रूपाश्री आणि आरोग साथी या योजना योग्यरित्या काम करत आहेत," अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालचे शहर विकास मंत्री फिरहद हकिम यांनी सांगितलं. 

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीChief Ministerमुख्यमंत्रीwest bengalपश्चिम बंगालprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी