शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

कृषी कायद्याविरोधात ममता बॅनर्जी आणणार विधानसभेत प्रस्ताव; विशेष अधिवेशनाला सुरुवात

By देवेश फडके | Updated: January 27, 2021 13:29 IST

राजधानी दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कृषी कायद्याविरोधात विधानसभेत प्रस्ताव आणणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.

ठळक मुद्देकृषी कायद्याविरोधात ममता बॅनर्जी सरकार प्रस्ताव आणणारकाँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे दोन वेगवेगळे प्रस्तावकाँग्रेसची ममता बॅनर्जी सरकारवर टीका

कोलकाता : राजधानी दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कृषी कायद्याविरोधात विधानसभेत प्रस्ताव आणणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यामध्ये केंद्रीय कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव आणला जाणार असून, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे. पश्चिम बंगाल विधानसभेचे संसदीय कार्यमंत्री पार्थ चॅटर्जी यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, विधानसभेच्या विशेष सत्राच्या दुसऱ्या दिवशी नियम १६९ अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे. 

काँग्रेसचाही कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव

काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव आणण्याची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची इच्छा होती. मात्र, तसे झाले नाही. नियम १८५ अंतर्गत काँग्रेस यासंदर्भात प्रस्ताव आणणार होती. एकाच मुद्यावर दोन वेगळ्या नियमांतर्गत प्रस्ताव कशासाठी? सरकार याच मुद्यावर प्रस्ताव आणणार आहे. सरकारचा प्रस्ताव स्वीकार करण्यात येईल, असा विश्वास चॅटर्जी यांनी व्यक्त केला. 

काँग्रेसची सरकारवर टीका

तृणमूल काँग्रेसला केंद्रीय कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव आणण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. कारण काही महिन्यांपूर्वीच असाच एक कायदा ममता बॅनर्जी सरकारने मंजूर केला होता, अशी टीका विरोधी पक्षनेते अब्दुल मन्नान यांनी केली आहे. दरम्यान, पंजाब, छत्तीसगड, राजस्थान, केरळ आणि दिल्ली या राज्यांमध्ये केंद्रीय कृषी कायद्याविरोधात विधानसभेत प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. 

केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्यात चर्चेच्या अकरा फेऱ्या झाल्या. मात्र, सर्व चर्चा निष्फळ ठरल्या. याशिवाय कृषी कायदे दीड वर्षांपर्यंत स्थगित करण्यास सरकार तयार असल्याचा प्रस्ताव केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ठेवला आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीFarmerशेतकरीagitationआंदोलन