शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

“आसाममधील बंडखोरांना पश्चिम बंगालला पाठवा, आम्ही योग्य पाहुणचार करु”: ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 21:35 IST

तुमचा पक्षही कोणीतरी फोडू शकतो, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी भाजपला दिला आहे.

कोलकाता: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर तिसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, एकनाथ शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. महाराष्ट्रातील या राजकीय रणधुमाळीवर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील घडामोडींना भाजप जबाबदार असल्याची टीका करत, सर्व बंडखोरांना पश्चिम बंगालमध्ये पाठवून द्यायला हवे. आम्ही योग्य तो पाहुणचार करु, असा टोलाही ममता बॅनर्जी यांनी लगावला.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण अक्षरश: ढवळून निघाले आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाला २४ तासांचे अल्टिमेटम दिला असून, मुंबईत परतण्याचे आवाहन केले आहे. मात्र, महाविकास आघाडीतून प्रथम बाहेर पडा, अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली आहे. उलट, गुवाहाटीवरून परतलेल्या शिवसेना आमदारांनी केलेल्या आरोपांना तेथील आमदारांनी व्हिडिओ जारी करत खोडून काढले आणि पक्षप्रमुखांना यांच्यापासून सावध राहावे, असा सल्लाही दिला. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत आता राष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

आसाममधील बंडखोरांना पश्चिम बंगालला पाठवा

उद्धव ठाकरेंसह आम्हाला सर्वांना न्याय हवा आहे. आताच्या घडीला (भाजप) सत्तेत आहे. पैसा, मसल, माफिया शक्ती वापरत आहात. पण एक दिवस जावे लागेल. तुमचा पक्षही कोणीतरी फोडू शकतो. हे चुकीचे आहे आणि मी त्याचे समर्थन करत नाही, या शब्दांत ममता बॅनर्जी यांनी हल्लाबोल केला. तसेच आसामऐवजी त्यांना (बंडखोर आमदार) बंगालमध्ये पाठवा. आम्ही त्यांचे चांगले आदरातिथ्य करू. महाराष्ट्रानंतर ते इतर सरकारही पाडतील. आम्हाला लोकांसाठी, संविधानाला न्याय हवा आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवसेनेतील हे तिसरे मोठे बंड आहे. मात्र, अशावेळी शिवसैनिक कायम नेतृत्वाच्या पाठीशी राहतात. अशा बंडावेळी शिवसेनेत नेते एकाबाजूला राहतात आणि शिवसैनिक एकाबाजूला राहतात. बंडखोरांना शिवसैनिक योग्य जागा दाखवून देतील. बंडखोरी करणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही, असे सांगत एक प्रकारे अजित पवार यांनी क्लीन चिट दिली. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीUddhav Thackerayउद्धव ठाकरे