शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“आसाममधील बंडखोरांना पश्चिम बंगालला पाठवा, आम्ही योग्य पाहुणचार करु”: ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 21:35 IST

तुमचा पक्षही कोणीतरी फोडू शकतो, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी भाजपला दिला आहे.

कोलकाता: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर तिसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, एकनाथ शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. महाराष्ट्रातील या राजकीय रणधुमाळीवर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील घडामोडींना भाजप जबाबदार असल्याची टीका करत, सर्व बंडखोरांना पश्चिम बंगालमध्ये पाठवून द्यायला हवे. आम्ही योग्य तो पाहुणचार करु, असा टोलाही ममता बॅनर्जी यांनी लगावला.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण अक्षरश: ढवळून निघाले आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाला २४ तासांचे अल्टिमेटम दिला असून, मुंबईत परतण्याचे आवाहन केले आहे. मात्र, महाविकास आघाडीतून प्रथम बाहेर पडा, अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली आहे. उलट, गुवाहाटीवरून परतलेल्या शिवसेना आमदारांनी केलेल्या आरोपांना तेथील आमदारांनी व्हिडिओ जारी करत खोडून काढले आणि पक्षप्रमुखांना यांच्यापासून सावध राहावे, असा सल्लाही दिला. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत आता राष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

आसाममधील बंडखोरांना पश्चिम बंगालला पाठवा

उद्धव ठाकरेंसह आम्हाला सर्वांना न्याय हवा आहे. आताच्या घडीला (भाजप) सत्तेत आहे. पैसा, मसल, माफिया शक्ती वापरत आहात. पण एक दिवस जावे लागेल. तुमचा पक्षही कोणीतरी फोडू शकतो. हे चुकीचे आहे आणि मी त्याचे समर्थन करत नाही, या शब्दांत ममता बॅनर्जी यांनी हल्लाबोल केला. तसेच आसामऐवजी त्यांना (बंडखोर आमदार) बंगालमध्ये पाठवा. आम्ही त्यांचे चांगले आदरातिथ्य करू. महाराष्ट्रानंतर ते इतर सरकारही पाडतील. आम्हाला लोकांसाठी, संविधानाला न्याय हवा आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवसेनेतील हे तिसरे मोठे बंड आहे. मात्र, अशावेळी शिवसैनिक कायम नेतृत्वाच्या पाठीशी राहतात. अशा बंडावेळी शिवसेनेत नेते एकाबाजूला राहतात आणि शिवसैनिक एकाबाजूला राहतात. बंडखोरांना शिवसैनिक योग्य जागा दाखवून देतील. बंडखोरी करणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही, असे सांगत एक प्रकारे अजित पवार यांनी क्लीन चिट दिली. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीUddhav Thackerayउद्धव ठाकरे