शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Mamata Banerjee: 'हिम्मत असेल तर मला अटक करुन दाखवा', ममता बॅनर्जींचे भाजपला आव्हान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 18:12 IST

Mamata Banerjee Rally: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

Mamata Banerjee Slams BJP: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) वरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपवर(BJP) जोरदार हल्ला चढवला आहे. ममता बॅनर्जी सोमवारी एका रॅलीला संबोधित करताना म्हणाल्या की, "निवडून आलेले सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पैसे कोठून मिळतात याचे त्यांनी उत्तर द्यावे. निवडून आलेल्या राज्य सरकारांना पाडण्यासाठी काळा पैसा आणि केंद्रीय एजन्सीचा वापर केला जात आहे."

'घोटाळा झाला पण..."ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, "भाजपचे नेते बेटी बचाओच्या गप्पा मारतात, पण त्यांच्या सरकारने बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना सोडले. भाजपवाले आम्हाला चोर म्हणतात. घोटाळा झाला आहे, पण डाव्या पक्षांनी केला आहे. पैसे खाण्याची त्यांची संस्कृती आहे, आमची नाही."

'हिम्मत असेल तर मला अटक करा'त्या पुढे म्हणाल्या की, ''हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, आम्ही भ्रष्ट असल्याचे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात कोणताही पुरावा सादर करू शकले नाही. पण, इकडे मीडिया ट्रायल सुरू असून ते आम्हाला चोर म्हणत आहेत. हे सर्व षडयंत्र आहे, मीडियावर विश्वास ठेवू नका. ते आमच्या नेत्यांच्या मागे लागले आहेत. मी त्यांना आव्हान देते की, हिम्मत असेल तर मला अटक करा. मी तुरुंगातून लढेन आणि जिंकेन. तुम्ही माझ्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही,'' अशी टीका ममतांनी केली. 

'महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी पैसा कुठून आला?'ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, "महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च केले, हा पैसा कुठून आला? तुम्ही झारखंडच्या आमदारांना पैसे देऊ केलेत. तुम्हाला झारखंड सरकार तोडायचे होते, मी ते थांबवले. अरविंद केजरीवाल म्हणतात, त्यांच्या आमदारांना पैसे देऊ केले आहेत. हा सगळा पैसा कुठून येत आहे," असा सवालही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपा