शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

देशासाठी सुरू असलेल्या संघर्षात काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी खरगे हेच सर्वार्थाने पात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 12:27 IST

खरगे यांना माझे आणि पक्षाचे पूर्ण समर्थन असल्याची ग्वाही काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी बुधवारी येथे दिली.

नवी दिल्ली -  देशासाठी सुरू असलेल्या संघर्षात खंबीर नेते म्हणून मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी सर्वार्थाने पात्र आहेत, असे प्रशंसोद्गार काढताना खरगे यांना माझे आणि पक्षाचे पूर्ण समर्थन असल्याची ग्वाही काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी बुधवारी येथे दिली.

निवडणुकीच्या राजकारणात ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष  खरगे यांच्यावरील ‘मल्लिकार्जुन खरगे - पॉलिटिकल एंगेजमेंट विथ कम्पॅशन, जस्टिस अँड इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सोनिया गांधी बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, राजदचे खासदार मनोज झा, द्रमुकचे ज्येष्ठ नेते टी. आर. बालू तसेच पुस्तकाचे संपादक सुखदेव थोरात आणि चेतन शिंदे उपस्थित होते. जवाहर भवन येथील सोहळ्यासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत, भूपेश बघेल आणि सुखविंदर सुक्खू उपस्थित होते. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, वर्षा गायकवाड, खा. कुमार केतकर, प्रा. भालचंद्र मुणगेकर आदी ज्येष्ठ नेते आले होते. खरगे यांच्या पत्नी राधाबाई खरगे, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी तसेच इंडिया आघाडीतील नेते उपस्थित होते. 

सोनिया गांधींनी केली मुक्तकंठाने प्रशंसाअतिशय महत्त्वाच्या घडीला खरगे यांच्या हाती काँग्रेस पक्षाची सूत्रे आहेत. राजकारणात ५० वर्षे हा प्रदीर्घ कालखंड ठरतो. राजकारणातील अनिश्चिततेच्या वाटचालीत खरगे केवळ टिकूनच राहिले नाहीत, तर त्यांच्या कारकिर्दीची कमान सतत चढती राहिली. त्यांनी आपल्या आदर्शवादाशी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळेच काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची प्रतिमा उत्तुंग ठरली आहे. व्यक्तिशः आपल्यासाठी खरगे हे एक विवेकी सहकारी आहेत. त्यांनी माझ्यावरची अनेक ओझी खंबीरपणे सांभाळली, असे सोनिया गांधी म्हणाल्या. 

मतभेद विसरून एकजूट होणे महत्त्वाचे : खरगेगेल्या पन्नास वर्षांत देश अनेक आव्हानांना सामोरा जाताना आपण पाहिले आहे. त्यावर मात करण्यासाठी आपसातील मतभेद विसरून आम्हाला एकजूट होण्याचे धाडस दाखवावे लागेल, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. सोनिया गांधी यांच्यापासून ज्यांच्याशी राजकीय आणि आदर्शवादावरून मतभेद आहेत, अशा नेत्यांनीही या पुस्तकासाठी हातभार लावल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. 

विश्वासार्हता आणि सचोटीचे प्रतीक : येचुरीबालपणी आपल्या आई-बहिणीसह रझाकारांच्या दंगलीत घर जळालेल्या खरगेंच्या मनात द्वेषाचा लवलेश नाही. राजकारणासाठीची सचोटी आणि विश्वासार्हता खरगे यांच्यापाशी आहे, असे सीताराम येचुरी म्हणाले. खरगे हे ‘इंडिया’तील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी त्याचे नेतृत्व करावे, असे टी. आर. बालू म्हणाले. खरगे हे आंबेडकर आणि नेहरू यांच्यातील दुवा बनण्याचे काम करीत आहेत, असे मनोज झा म्हणाले.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी