शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

परालीपासून तयार होऊ शकतो सीएनजी - अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 11:32 IST

दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या परालीपासून सीएनजी तयार होऊ शकतो अशी कल्पना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तज्ञांसोबत बैठक झाल्यावर मांडली.

ठळक मुद्देपरालीपासून सीएनजी तयार होऊ शकतो अशी कल्पना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तज्ञांसोबत बैठक झाल्यावर मांडली. शेजारी राज्यांनी पुढे येऊन विचार करावा असं आवाहनही केजरीवाल यांनी केलं.तयार होणाऱ्या सीएनजीचा आसपासच्या गावांमधील ट्रॅक्टरमध्ये वापर होऊ शकतो.

नवी दिल्ली - दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या परालीपासून सीएनजी तयार होऊ शकतो अशी कल्पना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तज्ञांसोबत बैठक झाल्यावर मांडली आहे. हा प्रयोग तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या सहज शक्य आहे असंही ते म्हणाले आहेत. त्यासाठी शेजारी राज्यांनी पुढे येऊन विचार करावा असं आवाहनही केजरीवाल यांनी केलं आहे. 

'हा प्रयोग केला तर यातून रोजगार उत्पन्न होईल व शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्नही मिळेल. त्यासोबतच दरवर्षीची प्रदूषणाची समस्याही मार्गी लागेल. मात्र त्यासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल' असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. परालीपासून सीएनजी तयार करण्यावर यापूर्वीही विचार झालेला आहे. त्यावर कामदेखील सुरू आहे. परालीपासून सीएनजीची निर्मिती करणारा प्रकल्प करनाल येथे उभारण्यात येणार असल्याची चर्चाही गेल्या महिन्यात पुढे आली होती. जर्मन तंत्रज्ञानाचा वापर हा यासाठी करण्यात येणार आहे. 

तयार होणाऱ्या सीएनजीचा आसपासच्या गावांमधील ट्रॅक्टरमध्ये वापर होऊ शकतो. त्यासाठी बारा ट्रॅक्टर सीएनजीमध्ये रुपांतरीत करण्यात आले आहेत. सीएनजीवर चालणारे हे देशातील पहिलेच ट्रॅक्टर असतील. असाही दावा यासोबत करण्यात आला आहे. हा प्रकल्प ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे प्रमुख अजय बंसल यांच्या वतीने विविध कंपन्यांच्या सहभागाने उभारण्यात येत आहे. पुढच्या वर्षी मे मध्ये प्रकल्प सुरू होईल. या प्रकल्पामुळे आसपासच्या 15 गावांमध्ये शेतात पराली जाळण्याचा प्रकार बंद होईल.

दररोज 10 हजार किलो सीएनजी

एका प्रकल्पाच्या ठिकाणी शंभर टन परालीपासून तयार झालेल्या पावडरने दहा हजार झालेल्या पावडरने दहा हजार किलो सीएनजीचे उत्पादन केले जाईल. ज्यांच्या शेतातील पराली वापरण्यात आली आहे त्यांना स्वस्त दरात सीएनजी विकण्यात येईल. 

दिल्लीमध्ये सोमवारपासून (4 नोव्हेंबर) दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियम लागू झाला आहे. दिल्ली सरकारने 4 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत हा वाहतूक नियम लागू केला आहे. दिल्लीतील प्रदूषणात वाहनांच्या धुराचा सहभाग असल्याने राज्याला ही समस्या भेडसावत आहे. अशातच शेजारच्या राज्यात शेतकरी पराली जाळत असल्याने प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनांसाठी सम-विषम नियम लागू करून सरकारने काही प्रमाणात प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. गाडीच्या क्रमांकाचा शेवटचा आकडा सम असेल तर सम दिवसांना रस्त्यावर फिरण्याची अनुमती असेल. तसेच विषम आकड्यांसाठी लागू असेल. रविवार वगळता दररोज सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत वाहतुकीसाठी हा नियम लागू असणार आहे. यातून दुचाकींना सवलत देण्यात आली आहे. तसेच रुग्णवाहिका, स्कूल बस, महिला यांना यातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय व्हीआयपींनाही या नियमातून वगळण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi pollutionदिल्ली प्रदूषणair pollutionवायू प्रदूषणdelhiदिल्ली