शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

परालीपासून तयार होऊ शकतो सीएनजी - अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 11:32 IST

दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या परालीपासून सीएनजी तयार होऊ शकतो अशी कल्पना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तज्ञांसोबत बैठक झाल्यावर मांडली.

ठळक मुद्देपरालीपासून सीएनजी तयार होऊ शकतो अशी कल्पना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तज्ञांसोबत बैठक झाल्यावर मांडली. शेजारी राज्यांनी पुढे येऊन विचार करावा असं आवाहनही केजरीवाल यांनी केलं.तयार होणाऱ्या सीएनजीचा आसपासच्या गावांमधील ट्रॅक्टरमध्ये वापर होऊ शकतो.

नवी दिल्ली - दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या परालीपासून सीएनजी तयार होऊ शकतो अशी कल्पना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तज्ञांसोबत बैठक झाल्यावर मांडली आहे. हा प्रयोग तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या सहज शक्य आहे असंही ते म्हणाले आहेत. त्यासाठी शेजारी राज्यांनी पुढे येऊन विचार करावा असं आवाहनही केजरीवाल यांनी केलं आहे. 

'हा प्रयोग केला तर यातून रोजगार उत्पन्न होईल व शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्नही मिळेल. त्यासोबतच दरवर्षीची प्रदूषणाची समस्याही मार्गी लागेल. मात्र त्यासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल' असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. परालीपासून सीएनजी तयार करण्यावर यापूर्वीही विचार झालेला आहे. त्यावर कामदेखील सुरू आहे. परालीपासून सीएनजीची निर्मिती करणारा प्रकल्प करनाल येथे उभारण्यात येणार असल्याची चर्चाही गेल्या महिन्यात पुढे आली होती. जर्मन तंत्रज्ञानाचा वापर हा यासाठी करण्यात येणार आहे. 

तयार होणाऱ्या सीएनजीचा आसपासच्या गावांमधील ट्रॅक्टरमध्ये वापर होऊ शकतो. त्यासाठी बारा ट्रॅक्टर सीएनजीमध्ये रुपांतरीत करण्यात आले आहेत. सीएनजीवर चालणारे हे देशातील पहिलेच ट्रॅक्टर असतील. असाही दावा यासोबत करण्यात आला आहे. हा प्रकल्प ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे प्रमुख अजय बंसल यांच्या वतीने विविध कंपन्यांच्या सहभागाने उभारण्यात येत आहे. पुढच्या वर्षी मे मध्ये प्रकल्प सुरू होईल. या प्रकल्पामुळे आसपासच्या 15 गावांमध्ये शेतात पराली जाळण्याचा प्रकार बंद होईल.

दररोज 10 हजार किलो सीएनजी

एका प्रकल्पाच्या ठिकाणी शंभर टन परालीपासून तयार झालेल्या पावडरने दहा हजार झालेल्या पावडरने दहा हजार किलो सीएनजीचे उत्पादन केले जाईल. ज्यांच्या शेतातील पराली वापरण्यात आली आहे त्यांना स्वस्त दरात सीएनजी विकण्यात येईल. 

दिल्लीमध्ये सोमवारपासून (4 नोव्हेंबर) दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियम लागू झाला आहे. दिल्ली सरकारने 4 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत हा वाहतूक नियम लागू केला आहे. दिल्लीतील प्रदूषणात वाहनांच्या धुराचा सहभाग असल्याने राज्याला ही समस्या भेडसावत आहे. अशातच शेजारच्या राज्यात शेतकरी पराली जाळत असल्याने प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनांसाठी सम-विषम नियम लागू करून सरकारने काही प्रमाणात प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. गाडीच्या क्रमांकाचा शेवटचा आकडा सम असेल तर सम दिवसांना रस्त्यावर फिरण्याची अनुमती असेल. तसेच विषम आकड्यांसाठी लागू असेल. रविवार वगळता दररोज सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत वाहतुकीसाठी हा नियम लागू असणार आहे. यातून दुचाकींना सवलत देण्यात आली आहे. तसेच रुग्णवाहिका, स्कूल बस, महिला यांना यातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय व्हीआयपींनाही या नियमातून वगळण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi pollutionदिल्ली प्रदूषणair pollutionवायू प्रदूषणdelhiदिल्ली