शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

प्रियांका गांधींना अध्यक्ष करा; मागणी जोर धरू लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 06:09 IST

काँग्रेसचे नेते राज बब्बर यांच्यासह ग्रुप २३ मधील नेतेही प्रियांका गांधी यांना अध्यक्ष करण्याच्या मागणीच्या बाजूने असल्याचे दिसते.

- शीलेश शर्मानवी दिल्ली :   काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुकांची चर्चा चालू असताना आता प्रियांका गांधी यांना काँग्रेसचे नवीन अध्यक्ष करण्याची मागणी  जोर धरू लागली आहे. काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णन यांनी ही मागणी करीत पक्षाला सल्लाही दिला की, बिगर-राजकीय लोकांकडून आता काम चालणार नाही. प्रियांका गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे नेते राज बब्बर यांच्यासह ग्रुप २३ मधील नेतेही प्रियांका गांधी यांना अध्यक्ष करण्याच्या मागणीच्या बाजूने असल्याचे दिसते. या सर्व नेत्यांचे असे म्हणणे आहे की, काँग्रेस  वेळेआधीच जागी झाली नाही आणि मागच्या निवडणुकीतील पराभवापासून काँग्रेसने धडा घेतला नाही, तर २०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकारच सत्तेत येईल.भाजपवर निशाणा साधत काँग्रेस नेते कृष्णन म्हणाले की, सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या मोदी सरकारने धर्माच्या नशेची सवय लावून लोकांना अफूच्या नशेपेक्षा अधिक व्यसनाधीन केले आहे. बिगर-राजकीय लोक आल्याने काँग्रेस कमकुवत होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या जाळ्यात काँग्रेस अडकली जात आहे. काँग्रेस हा मुस्लिम अल्पसंख्याक समुदायाचा पक्ष असल्याचे भासविण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे, जेणेकरून  मतांचे धुव्रीकरण करता येईल.आसाममध्ये बदरुद्दीन अजमल, पश्चिम बंगालमध्ये फुरफुरा शरीद पीरजादा आणि केरळमध्ये मुस्लिम लीगसोबत आघाडी करण्याची काँग्रेसला आवश्यकता नव्हती. असे केले नसते, तर काँग्रेसविरुद्ध हिंदू मतांचे धुव्रीकरण झाले नसते, असेही कृष्णन यांनी म्हटले आहे. कोरोना व्यवस्थापनावरून  मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला धक्का लागल्याचाही त्यांनी उल्लेख केला.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस