शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अकारण गळ्यात मारलेल्या चॅनेल्सना आता करा रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 05:40 IST

केबलचालकांच्या लबाडीला ‘ट्राय’चा लगाम, नववर्षात अंमलबजावणी

नवी दिल्ली : टीव्ही चॅनेलची निवड पद्धती आणि त्यांचे दर यात येत्या १ जानेवारीपासून अनेक बदल होणार आहेत. दूरसंचार नियामक ट्रायने एक आदेश जारी करून चॅनल्सची किरकोळ किंमत दर महिन्याला ठरविणे प्रसारकांना बंधनकारक केले आहे. त्यानुसार, हे बदल होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. यामुळे ग्राहकांनी निवडलेल्या पॅकेजमध्ये अजिबात न पाहिल्या जाणाऱ्या चॅनेलचा भरणा करून अधिक पैसे उकळण्याच्या लबाडीला लगाम लागणार आहे.कायदेशीर अडचणी न आल्यास ट्रायचा निर्णय १ जानेवारीपासून लागू होणार आहे. नव्या पद्धतीत आपल्या आवडीचे चॅनेल निवडून तेवढ्यांचेच पैसे देणे ग्राहकांना शक्य होणार आहे. चॅनेल्सचा एक पॅकेज (समुच्चय) विक्रीस ठेवण्याचा हक्क प्रसारकांना (ब्रॉडकास्टर्स) राहील. मात्र, या पॅकेजची किंमत त्यांना सर्व चॅनेल्सच्या एकूण किमतीच्या ८५ टक्क्यांपेक्षा कमी ठेवता येणार नाही. याचाच अर्थ, चॅनेल्सच्या पॅकेजवर त्यांच्या एकत्रित किमतीच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त सवलत प्रसारक देऊ शकणार नाहीत. चॅनेल्सचा पॅकेज देण्याची सध्याची पद्धत संपविण्यासाठी हा नियम केला असल्याचे समजते. चॅनेल पॅकेजवर १५ टक्क्यांपेक्षा अधिक स्वस्त मिळणार नसल्याने, यापुढे ग्राहक वैयक्तिक आवडीचे टीव्ही चॅनेल निवडून तेवढ्यांचेच पैसे भरतील.सूत्रांनी सांगितले की, चॅनेल्सचा पॅकेज सादर करताना प्रसारक अत्यल्प प्रेक्षक असलेल्या चॅनेल्सचा भरणा त्यात करतात. या पॅकजमध्ये चॅनेल्सची संख्या तर भरपूर असते, पण त्यात खरोखर पाहण्यायोग्य चॅनेल्सची संख्या फारच कमी असते. ही लबाडी रोखण्यासाठी ट्रायने चॅनेल्स पॅकच्या किमतींवर नियंत्रण आणले आहे.प्रकरण सुप्रीम कोर्टातट्रायचा नवा आदेश कायदेशीर लढाईत अडकलेला आहे. ट्रायने चॅनल्स पॅकेजच्या सवलतीवर लावलेली १५ टक्क्यांची मर्यादा मद्रास उच्च न्यायालयाने रद्द ठरविली आहे. प्रसारकांच्या एका याचिकेवर हा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयास ट्रायने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नव्या आदेशाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन