शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अकारण गळ्यात मारलेल्या चॅनेल्सना आता करा रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 05:40 IST

केबलचालकांच्या लबाडीला ‘ट्राय’चा लगाम, नववर्षात अंमलबजावणी

नवी दिल्ली : टीव्ही चॅनेलची निवड पद्धती आणि त्यांचे दर यात येत्या १ जानेवारीपासून अनेक बदल होणार आहेत. दूरसंचार नियामक ट्रायने एक आदेश जारी करून चॅनल्सची किरकोळ किंमत दर महिन्याला ठरविणे प्रसारकांना बंधनकारक केले आहे. त्यानुसार, हे बदल होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. यामुळे ग्राहकांनी निवडलेल्या पॅकेजमध्ये अजिबात न पाहिल्या जाणाऱ्या चॅनेलचा भरणा करून अधिक पैसे उकळण्याच्या लबाडीला लगाम लागणार आहे.कायदेशीर अडचणी न आल्यास ट्रायचा निर्णय १ जानेवारीपासून लागू होणार आहे. नव्या पद्धतीत आपल्या आवडीचे चॅनेल निवडून तेवढ्यांचेच पैसे देणे ग्राहकांना शक्य होणार आहे. चॅनेल्सचा एक पॅकेज (समुच्चय) विक्रीस ठेवण्याचा हक्क प्रसारकांना (ब्रॉडकास्टर्स) राहील. मात्र, या पॅकेजची किंमत त्यांना सर्व चॅनेल्सच्या एकूण किमतीच्या ८५ टक्क्यांपेक्षा कमी ठेवता येणार नाही. याचाच अर्थ, चॅनेल्सच्या पॅकेजवर त्यांच्या एकत्रित किमतीच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त सवलत प्रसारक देऊ शकणार नाहीत. चॅनेल्सचा पॅकेज देण्याची सध्याची पद्धत संपविण्यासाठी हा नियम केला असल्याचे समजते. चॅनेल पॅकेजवर १५ टक्क्यांपेक्षा अधिक स्वस्त मिळणार नसल्याने, यापुढे ग्राहक वैयक्तिक आवडीचे टीव्ही चॅनेल निवडून तेवढ्यांचेच पैसे भरतील.सूत्रांनी सांगितले की, चॅनेल्सचा पॅकेज सादर करताना प्रसारक अत्यल्प प्रेक्षक असलेल्या चॅनेल्सचा भरणा त्यात करतात. या पॅकजमध्ये चॅनेल्सची संख्या तर भरपूर असते, पण त्यात खरोखर पाहण्यायोग्य चॅनेल्सची संख्या फारच कमी असते. ही लबाडी रोखण्यासाठी ट्रायने चॅनेल्स पॅकच्या किमतींवर नियंत्रण आणले आहे.प्रकरण सुप्रीम कोर्टातट्रायचा नवा आदेश कायदेशीर लढाईत अडकलेला आहे. ट्रायने चॅनल्स पॅकेजच्या सवलतीवर लावलेली १५ टक्क्यांची मर्यादा मद्रास उच्च न्यायालयाने रद्द ठरविली आहे. प्रसारकांच्या एका याचिकेवर हा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयास ट्रायने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नव्या आदेशाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन