शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये पाककडून दहशतवादी हल्ल्याचं मोठं षडयंत्र; 10 हजार अतिरिक्त जवान तैनात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 14:17 IST

जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी उत्तर काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त जवानांची फौज तैनात करण्यात यावी  अशी मागणी केली आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीर खोऱ्यात लपलेल्या दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा एक गट मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात आल्या आहेत. 

केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावरुन परतल्यानंतर लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या म्हणजे 10 हजार भारतीय जवान तैनात केले आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डोवाल यांनी ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जम्मू काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात केल्याचं सांगण्यात येत आहे. 

तर जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी उत्तर काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त जवानांची फौज तैनात करण्यात यावी  अशी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीनंतरच केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. काही सूत्रांच्या माहितीनुसार कलम 35 ए हटविण्यावरुन राज्यातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. कलम 35 ए हटविण्यावरुन फुटिरतावादी नेत्यांनी विरोध केला आहे. पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनीही कलम 35 ए म्हणजे बॉम्ब आहे. जर तुम्ही त्याला हात लावाल तर स्फोट होईल आणि या स्फोटात तुम्ही जळून खाक व्हाल असा इशारा दिला आहे. 

काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांची कोणतीही कमी नाही असं असताना केंद्र सरकारकडून 10 हजार अतिरिक्त जवान तैनात करुन लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. कलम 35 ए हटविणे ही राजकीय समस्या आहे. त्या समस्येचं निरसन लष्करी सैन्य करु शकत नाही असा आरोप मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. 

काश्मीरच्या रक्षणासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढाई लढणार आहोत. आपल्याला एका मोठ्या लढाईसाठी तयार राहण्याची गरज आहे. निवडणुका येतील अन् जातील मात्र जम्मू काश्मीरला देण्यात आलेल्या विशेष दर्जासाठी आपल्याला लढत राहिलं पाहिजे. हे राज्य वाचविण्यासाठी कोणत्याही थराला आम्ही जाऊ शकतो असं मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानAjit Dovalअजित डोवाल