शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
7
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
8
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
9
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
10
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
11
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
12
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
13
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
14
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
15
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
16
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
17
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
18
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
19
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
20
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका

काश्मीरमध्ये पाककडून दहशतवादी हल्ल्याचं मोठं षडयंत्र; 10 हजार अतिरिक्त जवान तैनात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 14:17 IST

जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी उत्तर काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त जवानांची फौज तैनात करण्यात यावी  अशी मागणी केली आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीर खोऱ्यात लपलेल्या दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा एक गट मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात आल्या आहेत. 

केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावरुन परतल्यानंतर लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या म्हणजे 10 हजार भारतीय जवान तैनात केले आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डोवाल यांनी ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जम्मू काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात केल्याचं सांगण्यात येत आहे. 

तर जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी उत्तर काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त जवानांची फौज तैनात करण्यात यावी  अशी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीनंतरच केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. काही सूत्रांच्या माहितीनुसार कलम 35 ए हटविण्यावरुन राज्यातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. कलम 35 ए हटविण्यावरुन फुटिरतावादी नेत्यांनी विरोध केला आहे. पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनीही कलम 35 ए म्हणजे बॉम्ब आहे. जर तुम्ही त्याला हात लावाल तर स्फोट होईल आणि या स्फोटात तुम्ही जळून खाक व्हाल असा इशारा दिला आहे. 

काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांची कोणतीही कमी नाही असं असताना केंद्र सरकारकडून 10 हजार अतिरिक्त जवान तैनात करुन लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. कलम 35 ए हटविणे ही राजकीय समस्या आहे. त्या समस्येचं निरसन लष्करी सैन्य करु शकत नाही असा आरोप मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. 

काश्मीरच्या रक्षणासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढाई लढणार आहोत. आपल्याला एका मोठ्या लढाईसाठी तयार राहण्याची गरज आहे. निवडणुका येतील अन् जातील मात्र जम्मू काश्मीरला देण्यात आलेल्या विशेष दर्जासाठी आपल्याला लढत राहिलं पाहिजे. हे राज्य वाचविण्यासाठी कोणत्याही थराला आम्ही जाऊ शकतो असं मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानAjit Dovalअजित डोवाल