शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार, १३ महिन्यांच्या राजकीय मोहिमेची घोषणा, 'या' मुद्यांवर रान उठविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 11:55 IST

एप्रिलमध्ये काँग्रेसचे गुजरातमध्ये अधिवेशन

राम मगदूम/प्रकाश बेळगोजीबेळगाव : संविधानावरील कथित हल्ला तसेच महागाई आणि भ्रष्टाचाराबद्दल लोकांच्या चिंता यासारखे मुद्दे उपस्थित करून सरकारविरोधात रान उठविण्यासाठी काँग्रेसने गुरुवारी पदयात्रेसह १३ महिन्यांच्या राजकीय मोहिमेची घोषणा केली. पक्षात मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात येणार असून ही प्रक्रिया लगेच सुरू होईल आणि पुढील वर्षभर चालेल.काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या विस्तारित काँग्रेस कार्यकारिणीच्या म्हणजेच नव सत्याग्रह बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले. त्यातील एक महात्मा गांधींवर आणि दुसरा राजकीय होता. पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे, माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस जयराम रमेश आणि के. सी. वेणुगोपाल यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते "ऐतिहासिक" बैठकीला उपस्थित होते. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जयराम रमेश आणि पवन खेरा उपस्थित होते.के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, २०२५ हे वर्ष संघटनेच्या सुधारणेचे वर्ष असणार आहे. नेतृत्व करण्याची क्षमता आणि उत्तरदायित्व या दोन गुणाच्या आधारावर पक्षात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात येणार आहेत.

जय बापू, जय भीम आणि जय संविधान अभियान२७ डिसेंबर २०२४ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत 'जय बापू, जय भीम आणि जय संविधान अभियान' असेल . ते गाव, ब्लॉक, जिल्हा आणि राज्याराज्यांत राबविण्यात येईल. या अभियानाचे नेतृत्व राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व करणार असल्याचेही वेणुगोपाल यांनी सांगितले. संविधानावरील हल्ला, संविधानाच्या मूल्यांचा ऱ्हास, महागाई आणि भ्रष्टाचार यासारखे लोकांचे प्रश्न या अभियानाद्वारे मांडणार आहोत, २६ जानेवारीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी महु येथे विशाल रॅलीने त्याच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होईल. असेही ते म्हणाले.

एप्रिलमध्ये काँग्रेसचे गुजरातमध्ये अधिवेशनमहात्मा गांधीजींच्या विचारांवर पंतप्रधान, गृहमंत्री,भाजप व आरएसएसकडून हल्ले होत आहेत. यामुळे गुजरातमध्ये एप्रिल महिन्यात काँग्रेसचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तब्बल चार तास बैठकया बैठकीला विस्तारित कार्यकारिणीचे देशभरातील १३२ सदस्य उपस्थित होते.त्यापैकी ५० जणांनी चर्चेत भाग घेतला. अध्यक्ष खर्गे व राहुल गांधी यांनी सखोल विवेचन केले.तब्बल चार तास ही बैठक चालली.

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaonबेळगावcongressकाँग्रेस