शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

हरियाणात मोठा घटनात्मक पेच; विधानसभा १३ सप्टेंबरला भंग होणार; सैनी राज्यपालांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 20:05 IST

Haryana Election Politics: खरेतर शेवटचे अधिवेशन हे मतदारांना भुलविण्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा करण्यासाठी वापरले जाते. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली गेली.

हरियाणाच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी गेले सहा महिने झाले तरी विधानसभा अधिवेशनच न घेतल्याने मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. निवडणुकी आधीच काही दिवस विधानसभा भंग करण्याची वेळ भाजप सरकारवर आली आहे. मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत विधानसभा भंग करण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

यानुसार सैनी हे राज्यपाल बंडारु दत्तात्रेय यांना भेटले असून रात्री साडे नऊपर्यंत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हरियाणात ५ ऑक्टोबरला निवडणूक आहे. सैनी यांनी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतली होती. परंतू, त्यांनी निवडणुकीच्या आधी काही महिने असूनही पावसाळी अधिवेशन घेतले नाही. दोन अधिवेशनांमधील कालावधी हा कमीतकमी सहा महिन्यांचा असावा लागतो. 

या सहा महिन्यांची मुदत गुरुवारी, १२ सप्टेंबरला संपत आहे. यामुळे १३ सप्टेंबरला विधानसभा भंग करण्याशिवाय भाजपकडे पर्याय राहिलेला नाही. यामुळे सैनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता असून राज्यपाल त्यांना नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री बनविण्याची शक्यता आहे. 

सैनी रात्री पुन्हा राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. यावेळी ते राजनाम्याची घोषणा करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता सहा महिने संपले तरी अधिवेशन न घेण्याच्या भाजपाच्या भुमिकेचा राजकारणावर आणि मतांवर काय परिणाम होतो, हे देखील येत्या काही दिवसांत समजणार आहे. खरेतर शेवटचे अधिवेशन हे मतदारांना भुलविण्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा करण्यासाठी वापरले जाते. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणून शिंदे-फडणवीस-पवार सरकारने महिला मतदारांना महायुतीकडे खेचण्याची रणनिती आखली आहे. परंतू, हरियाणात असे डावपेच का खेळले गेले नाहीत, हे देखील राजकीय तज्ञांना पडलेले कोडे आहे.  

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपा