शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

झटका! अटल पेन्शन योजनेत मोठा बदल; कर भरणाऱ्यांना सहभागी नाही होता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 06:22 IST

करदात्यांना झटका

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनेत (एपीआय) मोठे बदल केले आहेत. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १ ऑक्टोबर २०२२ पासून आयकर भरणारी व्यक्ती या योजनेत सहभागी होण्यास पात्र ठरणार नाही. ही योजना मोदी सरकारने २०१५ मध्ये सुरू केली होती. ही योजना मुख्यत्वे असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी तयार करण्यात आली आहे.

अर्थ मंत्रालयाने म्हटले की, जर एखादा ग्राहक १ ऑक्टोबर किंवा त्यानंतर या योजनेत सहभागी झाला आणि नंतर तो आयकरदाता असल्याचे आढळले, तर त्याचे अटल पेन्शन योजनेचे खाते बंद केले जाईल आणि तोपर्यंत जमा केलेली पेन्शन रक्कम ग्राहकांना परत केली जाईल. सेवानिवृत्तीनंतर ज्यांचा निश्चित उत्पन्नाचा स्त्रोत नाही त्यांच्यासाठी अटल पेन्शन योजना आहे.

नेमकी काय आहे योजना? 

या योजनेंतर्गत, वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर, दरमहा १,००० ते ५,००० रुपये पेन्शन मिळते. १८ वर्षे ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. म्हणजेच यामध्ये किमान २० वर्षे गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. दरमहा १ ते ५ हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी दरमहा ४२ ते २१० रुपये द्यावे लागतील. जर एखाद्या ग्राहकाने वयाच्या ४० व्या वर्षी ही योजना घेतली तर त्याला दरमहा २९१ रुपये ते १,४५४ रुपये योगदान द्यावे लागेल. सबस्क्रायबर जितके जास्त योगदान देईल तितके जास्त पेन्शन त्याला निवृत्तीनंतर मिळेल.

खातेदाराच्या मृत्यूनंतर, त्याच्या/तिच्या जोडीदाराला समान पेन्शन दिली जाईल आणि दोघांच्या मृत्यूनंतर, ६० वर्षे वयापर्यंत जमा झालेली पेन्शन रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला परत केली जाईल.ग्राहकाचा अकाली मृत्यू झाल्यास (वय ६० वर्षापूर्वी), जोडीदार उर्वरित कालावधीसाठी योगदान चालू ठेवू शकतो. या योजनेत सरकार किमान पेन्शनची हमी देते.

हप्ता कसा भरणार? 

या योजनेंतर्गत, गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक किंवा अर्ध-वार्षिक म्हणजेच ६ महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूक करू शकतात. योगदान ॲाटो-डेबिट केले जाईल, म्हणजे रक्कम आपोआप तुमच्या खात्यातून वजा केली जाईल आणि तुमच्या पेन्शन खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे ग्राहकांना प्रत्येक वेळी बँकेत जाण्याची गरज लागत नाही.

खाते कसे उघडणार? 

या योजनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या ४ कोटींच्या पुढे गेली आहे. पेन्शन फंड रेग्युलेटर पीएफआरडीएनुसार, अटल पेन्शन योजनेंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच (२०२१-२२) मध्ये ९९ लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली. सर्व राष्ट्रीयीकृत बँका ही योजना देतात. बँकेत जाऊन या योजनेचे खाते उघडता येते.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारTaxकरIndiaभारत