शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चं मोठं संकट; ४ राज्यात अलर्ट जारी, जाणून घ्या H5N1ची लक्षणं काय?

By प्रविण मरगळे | Updated: January 4, 2021 13:23 IST

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये बर्ड फ्लूच्या आगमनाने अधिकारीही धास्तावले आहेत. आतापर्यंत राज्यभरात २४५ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे

ठळक मुद्देहिमाचल प्रदेशच्या प्रसिद्ध पोंग धरण परिसरात संशयास्पद स्थितीत १७०० स्थलांतरित पक्षांचा मृत्यू सरकारने सर्व जिल्ह्यांमधील पक्ष्यांच्या अनैसर्गिक मृत्यूविषयी पशुसंवर्धन विभागाला कळविण्यास सांगितले आहेराजस्थान, मध्य प्रदेशनंतर आता हिमाचल प्रदेश, झारखंडमध्ये सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली – कोरोना महामारीच्या संकटात आता बर्ड फ्लूचं नवं संकट उभं राहिलं आहे. राजस्थान, मध्य प्रदेशनंतर आता हिमाचल प्रदेश, झारखंडमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बर्ड फ्लू म्हणून ओळखला जाणारा हा रोग एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस एच 5 एन 1मुळे होतो, ज्याच्या विळख्यात पक्षी आल्यानंतर त्यांचा मृत्यू होतो, हा रोग मानवांसाठीदेखील अत्यंत धोकादायक आहे. हा जीवघेणा रोग असून बर्ड फ्लूचा कहर पाहून केंद्रासह राज्य सरकारनेही सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कुठे किती प्रकरणे आढळली?

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये बर्ड फ्लूच्या आगमनाने अधिकारीही धास्तावले आहेत. आतापर्यंत राज्यभरात २४५ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यात झालावाडमध्ये १००, कोटामध्ये ४७, बारामध्ये ७२, पालीमध्ये १९ आणि जयपूरच्या जलमहलमधील १० कावळ्यांचा समावेश आहे. कावळ्यांचा मृत्यू झाल्याने पशुसंवर्धन विभागाचे पथक तपास करण्यासाठी झालावाड येथे पोहोचली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर तपास पथकाने संपूर्ण परिसर स्वच्छ केला. यासह प्रोटोकॉलनुसार सर्व मृत कावळ्यांना खड्ड्यात जाळण्यात आले जेणेकरून या भागात संसर्ग होण्याचा धोका होऊ नये.

त्याच वेळी, हिमाचल प्रदेशच्या प्रसिद्ध पोंग धरण परिसरात संशयास्पद स्थितीत १७०० स्थलांतरित पक्षांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. गुगलाडाच्या जगमोली येथे बहुतेक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. तथापि, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की वेगवेगळ्या भागातील १५ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. बॅक्टेरिया, पॅथोजेन आणि विषाणूजन्य अहवाल काही दिवसात उपलब्ध होतील. तोपर्यंत आम्ही बर्ड फ्लूची पुष्टी करू शकत नाही. परंतु हा फ्लू असल्याची भीती व्यक्त केली जात आहे कारण पक्षी मोठ्या संख्येने मरत आहेत.

झारखंडमध्येही अलर्ट

बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता झारखंड सरकारही सतर्क झालं आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यात बर्ड फ्लूने ठोठावल्यानंतर राज्य सरकारही सतर्क झाली आहे. सरकारने सर्व जिल्ह्यांमधील पक्ष्यांच्या अनैसर्गिक मृत्यूविषयी पशुसंवर्धन विभागाला कळविण्यास सांगितले आहे व विसाराचा नमुने लॅबमध्ये पाठविण्यास सांगितले आहे. रांची येथील बिसरा कृषी महाविद्यालयाचे डॉक्टर सुशील प्रसाद म्हणाले की, झारखंडमध्ये आतापर्यंत बर्ड फ्लूचा एकही प्रकार आढळलेला नाही. पण शेजारच्या बंगालमधून येणारे पक्षी त्रास वाढवू शकतात.

ते म्हणाले, कोणत्याही कुक्कुटपालन करणाऱ्यांच्या येथे १० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाल्यास तातडीने पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांची तपासणी करा. बांगलादेशातून हा विषाणू भारतात प्रवेश करतो, विशेषत: बंगालसारख्या राज्यांमधून कोंबड्यांच्या आयातीमुळे बर्ड फ्लू होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत लोकांनी चिकन खाणे टाळावे,त्यासाठी खबरदारी घ्यायलाच हवी.

मध्य प्रदेशातही बर्ड फ्लूचा कहर

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये जवळपास ५० कावळ्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. तीन दिवसांपूर्वी इंदूरमध्ये ५० कावळ्यांचा मृतदेह सापडला होता. त्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. यासाठी संबंधित संस्था सतर्क आहेत.

मानवासाठी कोणती लक्षणे आहेत आणि किती धोकादायक आहेत

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होते. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवांमध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो. म्हणूनच, डॉक्टर बर्‍याचदा सल्ला देतात की, जर बर्ड फ्लूचा संसर्ग ज्या भागात पसरला असेल तिथे मांसाहार खरेदी करताना स्वच्छता ठेवा आणि मास्क लावून संक्रमित क्षेत्रात जा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थानJharkhandझारखंडHimachal Pradeshहिमाचल प्रदेश