शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मोठा हल्ला टळला! नक्षलवाद्यांनी पेरलेला 50 किलो IED; सुरक्षा दलांनी केला नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:40 IST

नक्षलवाद्यांनी एका पुलाखाली 50 किलो स्फोटके पेरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

बिजापूर: हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी मोठा झटका दिला आहे. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी सुमारे 50 किलो इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (IED) नष्ट केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बासागुडा-आवापल्ली रस्त्यावरील पुलाखाली हे 50 किलो आईडी लावण्यात आला होता. यादरम्यान, गस्तीवर निघालेल्या सीआरपीएफच्या पथकाला हे स्पोटके आढळले.

पुलाखाली पेरला आयईडी सुरक्षा दलाचे पथक तिमापूर दुर्गा मंदिराजवळ असताना त्यांना नक्षलवाद्यांनी पुलाखाली सुमारे 50 किलो आयईडी पेरल्याची माहिती मिळाली. अधिका-यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी पुलाखालील काँक्रीट काढून त्यात हे आयईडी लपवले होते. आयईडी शोधण्यासाठी मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला. अथक प्रयत्नानंतर हा आयईडी निकामी करण्यात आला.

नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळून लावलेअधिका-यांनी सांगितले की, मोठ्या वाहनांना उडवण्यासाठी हे 'रिमोट कंट्रोल' आयईडी पेरला होता. मात्र सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळून लावले. हा भूसुरुंग नष्ट करताना रस्त्यावर खोल खड्डा तयार झाला होता, तो भरून वाहतूक पूर्ववत करण्यात येत आहे.

6 जानेवारीला झालेला मोठा स्फोट या महिन्याच्या 6 तारखेला राज्यातील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी भूसुरुंगाचा स्फोट केला होता, ज्यात 8 सुरक्षा कर्मचारी आणि वाहन चालकासह नऊ जणांना जीव गमवावा लागला. ही घटना घडवण्यासाठी माओवाद्यांनी सुमारे 70 किलो वजनाचा आयईडी वापरला होता.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारी