शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

भयंकर! बिहारमध्ये भीषण अपघात; 9 जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 10:56 IST

15 जण ऑटोमधून जात असताना अज्ञात वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिली. यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जण जखमी झाले.

बिहारच्या लखीसरायमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथे झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रामगडचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिहारौरा गावात घडली. ही घटना आज रात्री 1.30 ते 2 च्या दरम्यान घडली. अज्ञात वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्याने ऑटोचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. लखीसराय-सिकंदरा मुख्य रस्त्यावरील बिहारौरा गावाजवळ हा भीषण अपघात झाला.

15 जण ऑटोमधून जात असताना अज्ञात वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिली. यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जण जखमी झाले. मृतांमध्ये 8 लोक मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहेत. हे सर्व लोक केटरिंगचे काम करायचे, जे काम करून सिकंदराहून लखीसरायला येत होते.

मृतांमध्ये ऑटोचालक मनोज कुमार, दिवाना कुमार, छोटू कुमार, रामू कुमार, अमित कुमार यांच्यासह 9 जणांचा समावेश आहे. ऑटोचालक मनोज हा जिल्ह्यातील महिसोना गावचा होता. 5 जखमींना उपचारासाठी पाटणा PMCH मध्ये रेफर करण्यात आले आहे. आजूबाजूच्या लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. 

घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.

टॅग्स :AccidentअपघातBiharबिहार