शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 09:00 IST

आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात रविवारी एका ग्रेनाइट खाणीत मोठी दगड कोसळून ओडिशातील सहा स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले.

आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात रविवारी एका ग्रेनाइट खाणीत मोठी दगड कोसळून ओडिशातील सहा स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला, त्यावेळी १० ते १५ मजूर खाणीत काम करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना चार-चार लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व बळी ओडिशाचे रहिवासी होते. "पाण्याच्या गळतीमुळे दगड सरकले असावेत आणि त्यामुळे हा अपघात झाला असावा, असा आम्हाला संशय आहे. घटनास्थळी कोणताही स्फोट किंवा भूकंपाची क्रिया झाली नव्हती. फॉरेन्सिक टीम तपास करत आहे," असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

बचाव कार्य आणि मदतीची घोषणाअपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले, ज्यात खाण विभागाचे अधिकारी आणि पोलीस सहभागी झाले होते. ओडिशाच्या ब्रह्मपूर येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गंजम जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक मृतदेहांना परत आणण्यासाठी बापटलाच्या बल्लीकुरवा येथे रवाना झाले आहे.

ओडिशा मुख्यमंत्री कार्यालयाने 'एक्स'वर पोस्ट करून मृतांची नावे जाहीर केली गंजम जिल्ह्यातील दंड बडत्या, बनमाल चेहरा, भास्कर बिसोई, संतोष गौड आणि गजपती जिल्ह्यातील ताकुमा दलाई, मूसा जान.

सीएमओंनी सांगितले की, मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना चार-चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. गंजमचे जिल्हाधिकारी कीर्ति वासन व्ही. यांनी सांगितले की, दिगपहांडीच्या सहायक तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील एक पथक मृतदेह त्यांच्या मूळ गावी आणण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले आहे.

"मी बापटलाच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून अपघात आणि ओडिशातील जखमी मजुरांच्या स्थितीबद्दल माहिती घेतली आहे. पोस्टमार्टम झाल्यानंतर मृतदेह ओडिशा पथकाला सुपूर्द केले जातील. मृतदेह ओडिशाला आणण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक व्यवस्था केली आहे," असे जिल्हाधिकारी म्हणाले. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे निर्देशनायडू यांनी एका निवेदनात म्हटले की, "मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि त्यांना जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे आणि अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत." युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी प्रमुख वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. "ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे. हे मजूर आपल्या कुटुंबासाठी मेहनत करताना आपला जीव गमावून बसले," असे रेड्डी म्हणाले.

रेड्डी यांनी सरकारला जखमींना योग्य वैद्यकीय सुविधा देण्याचे आणि मृतांच्या कुटुंबीयांना त्वरित मदत देण्याचे आवाहन केले. ओडिशा सरकारमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, या अपघातात किमान आठ ओडिशाचे मजूर जखमी झाले असून त्यांना आंध्र प्रदेशातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाला त्यावेळी खाणीत किमान १६ मजूर काम करत होते, असेही त्यांनी सांगितले. ओडिशाचे उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंह देव यांनीही या दुर्घटनेतील मजुरांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातAndhra Pradeshआंध्र प्रदेश