शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय वाढ; आनंद महिंद्रांनी दिला सल्ला, म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 12:07 IST

Anand Mahindra : सातत्यानं लॉकडाऊन लावत गेलो तर त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील असंही महिंद्रांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देसातत्यानं लॉकडाऊन लावत गेलो तर त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील असंही महिंद्रांनी म्हटलं आहे.गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या

भारतातील दिग्गज उद्योजक आणि महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख (Mahindra and Mahindra) आनंद महिंद्रा यांनी महाराष्ट्र सरकारकडे एक मागणी केली आहे. राज्यात गरजेनुसार लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. "देशात अर्ध्यापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. हे राज्य देश आणि आर्थिक घडामोडींचं केंद्र आहे. सारखं सारखं लॉकडाऊन लावल्यानं आर्थिक स्थिती अधिक खालावेल. यावेळी करोना लसीच्या आपात्कालिन वापराची गरज आहे. जेणेकरून हे संक्रमण कमीतकमी लोकांमध्ये पसरेल," असं महिंद्रा म्हणाले. पंतप्रधान कार्यालय, आरोग्यमंत्र्यांना केलं टॅगआनंद महिंद्रा यांनी आपलं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनादेखील टॅग केलं आहे. यानंतर त्यांनी आणखी एक ट्वीट केलं. "कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. अशातच लसीकरण अधिक वेगानं करण्याची गरज आहे. जर आपण हे केलं नाही, तर आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचाही सामना करावा लागू शकतो," असं त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आनंद महिंद्रांच्या या ट्वीटला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे. तसंच त्यांचं म्हणणं योग्य असल्याचं म्हणत अनेकांनी पाठइंबाही दिला आहे. काही जणांनी कोरोनाचे वाढते रुग्ण नक्कीच चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं. परंतु आपल्याला एकत्र राहून कोरोनावर विजय मिळवावा लागेल असं एका युझरनं म्हटलं.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राMahindraमहिंद्राCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस