शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय वाढ; आनंद महिंद्रांनी दिला सल्ला, म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 12:07 IST

Anand Mahindra : सातत्यानं लॉकडाऊन लावत गेलो तर त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील असंही महिंद्रांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देसातत्यानं लॉकडाऊन लावत गेलो तर त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील असंही महिंद्रांनी म्हटलं आहे.गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या

भारतातील दिग्गज उद्योजक आणि महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख (Mahindra and Mahindra) आनंद महिंद्रा यांनी महाराष्ट्र सरकारकडे एक मागणी केली आहे. राज्यात गरजेनुसार लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. "देशात अर्ध्यापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. हे राज्य देश आणि आर्थिक घडामोडींचं केंद्र आहे. सारखं सारखं लॉकडाऊन लावल्यानं आर्थिक स्थिती अधिक खालावेल. यावेळी करोना लसीच्या आपात्कालिन वापराची गरज आहे. जेणेकरून हे संक्रमण कमीतकमी लोकांमध्ये पसरेल," असं महिंद्रा म्हणाले. पंतप्रधान कार्यालय, आरोग्यमंत्र्यांना केलं टॅगआनंद महिंद्रा यांनी आपलं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनादेखील टॅग केलं आहे. यानंतर त्यांनी आणखी एक ट्वीट केलं. "कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. अशातच लसीकरण अधिक वेगानं करण्याची गरज आहे. जर आपण हे केलं नाही, तर आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचाही सामना करावा लागू शकतो," असं त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आनंद महिंद्रांच्या या ट्वीटला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे. तसंच त्यांचं म्हणणं योग्य असल्याचं म्हणत अनेकांनी पाठइंबाही दिला आहे. काही जणांनी कोरोनाचे वाढते रुग्ण नक्कीच चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं. परंतु आपल्याला एकत्र राहून कोरोनावर विजय मिळवावा लागेल असं एका युझरनं म्हटलं.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राMahindraमहिंद्राCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस