शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
2
भाजप आणि शिंदे सेनेत राडा, काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण?
3
'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक १,१०,००० मेट्रिक टन चांदी; पाहा भारताकडे किती आहे चांदीचा साठा
4
BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
5
मतदान केंद्रात शिरला घोणस जातीचा विषारी साप, उडाली खळबळ
6
Maharashtra Municipal Election 2026 Voting LIVE Updates: “हे आम्ही खपवून घेणार नाही”; मतदान केल्यावर राज ठाकरेंचा इशारा
7
मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भयानक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं 
8
IIT इंजिनिअर बनला 'डिजिटल धोबी'! ८४ लाखांची नोकरी सोडून उभा केला १६० कोटींचा 'यूक्लीन' ब्रँड
9
६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
10
सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना
11
"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका
12
Makar Sankranti 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता कुंतीने दिले होते 'हे' दान; यंदा तुम्हीही लुटा 'कुंतीचे वाण'
13
२१ जानेवारीपासून अमेरिकेची दारे बंद! ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया रोखली; भारतावर काय होणार परिणाम?
14
मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले...
15
PMC Election 2026: पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले
16
निवृत्तीची चिंता संपली! पोस्टाची 'ही' स्कीम करेल मालामाल; दरमहा होईल ₹२०,००० ची कमाई, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल
18
कर्मचाऱ्यांना मिळणार ₹२ कोटींपर्यंतच्या इन्शुरन्स, स्वस्त लोनसह हे फायदे; लाँच झाली नवी सुविधा, जाणून घ्या
19
काही हरवलंय? काळजी सोडा! 'हा' एक मंत्र तुमची वस्तू शोधून देईल; अनेकांनी घेतलाय अनुभव 
20
731666404000 रुपये 'साफ'...! मुकेश अंबानी 100 अब्ज डॉलरच्या क्लब मधून बाहेर; आता Q3 वर नजर
Daily Top 2Weekly Top 5

मेहबुबा सरकारचा राजीनामा, अपवित्र युती संपल्याबद्दल काँग्रेसला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 06:24 IST

काश्मीरमधील बिघडत्या परिस्थितीचे कारण पुढे करीत आणि काश्मीर प्रश्नाबाबत अयशस्वी ठरल्याचा शिक्का पुसून काढण्यासाठी भाजपाने मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा अखेर मंगळवारी काढून घेतला.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : काश्मीरमधील बिघडत्या परिस्थितीचे कारण पुढे करीत आणि काश्मीर प्रश्नाबाबत अयशस्वी ठरल्याचा शिक्का पुसून काढण्यासाठी भाजपाने मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा अखेर मंगळवारी काढून घेतला. त्यानंतर, मेहबुबा यांनी ताबडतोब राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. हे होणे अपेक्षितच होते. तिथे राज्यपालांची राजवट लागू न करण्याचा व विधानसभा विसर्जित न करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.राज्यपाल एन. एन. वोहरा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राज्यपाल राजवटीचा प्रस्ताव पाठविला आहे. राज्यपालांना प्रशासन हाताळण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती केली जाईल. भाजपाने राज्यपालांना पत्र पाठवून सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा मेहबुबा मुफ्ती यांचा निर्णय रद्द करा, अशी मागणी केली आहे.अमित शाह यांच्याशी सोमवारी मोदी यांनी चर्चा केल्यानंतर मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय झाला. त्या आधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा झाली. गृहमंत्री राजनाथ सिंहही त्यात सहभागी होते. त्यानंतर काश्मीरच्या भाजपा मंत्र्यांना दिल्लीत निर्णयाची माहिती दिली.या निर्णयानंतर राजनाथ सिंह यांच्याकडे अजित डोवाल व गुप्तचर प्रमुख राजीव जैन व इतरांच्या उपस्थितीत बैठक झाली. राज्यपाल एन. एन. व्होरा व यांचीही चर्चा झाली. भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका पीडीपीवर ठेवला.>मेहबुबा मुफ्ती यांची भाजपावर टीकाभाजपाने आघाडी तोडल्याबद्दल मुफ्ती यांनी टीका केली. आपले वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांना पीडीपीला पूर्ण काळासाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले होते, याची त्यांनी आठवण करून दिली. त्या म्हणाल्या की, आघाडीचा उद्देश एकतर्फी शस्त्रसंधी, पाकिस्तानशी चर्चा, ११ हजार युवकांवरील गुन्हे मागे घेणे, असा होता. पीडीपीने कलम ३७० चे समर्थन न्यायालयांत करून ते वाचविले. सलोखा व संवाद हा सरकारचा मुख्य उद्देश होता. शक्ती दाखविण्याचे धोरण कामाला येत नाही, असेही त्यांनी सांगितले. येथेच थांबून त्यांनी चेंडू पुन्हा मोदी सरकारच्या बाजूने ढकलला.>पीडीपीतही नाराजीसरकारमधील सहभागामुळे आपण देशातील हिंदू व्होट बँक गमावू, याची भीती भाजपाला होती, तर भाजपाला जवळ केल्याने काश्मीर खोºयातील मुस्लिमांचा मेहबुबा यांच्यावरील राग वाढल्याने पीडीपीमध्येही नाराजी होती. दहशतवाद वाढण्यास पीडीपी जबाबदार असल्याची शंका भाजपा नेते करीत होते, तर हिंदुत्ववादी पक्षाच्या साथीमुळे मुस्लीम तरुण अतिरेकाकडे वळत असल्याचे पीडीपी नेत्यांचे म्हणणे होते.>भाजपाने मेहबुबांवर फोडले काश्मीरच्या स्थितीचे खापरभाजपाने जम्मू-काश्मिरातील मेहबुबा मुफ्ती सरकारशी तीन वर्षांपूर्वीची आघाडी तोडताना राज्यातील बिघडत्या परिस्थितीचे खापर मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांच्यावर फोडले आहे. भाजपाचे महासचिव आणि राम माधव म्हणाले की, भाजपासाठी जम्मू-काश्मीर भारताचा अभिन्न भाग आहे. मात्र, सद्यस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी येथे राज्यपाल शासन आणले जावे, असा आम्ही निर्णय घेतला आहे.>ती भाजपाचीचूकच होतीपीडीपीबरोबर जाऊ न भाजपाने हिमालयाइतकी मोठी चूक केल्याचे मी तीन वर्षांपूर्वीच म्हटले होते. तेव्हा भाजपाला ते मान्य नव्हते. आता ती चूक आपल्याकडून झाल्याचे भाजपाने मान्य केले आहे. आता राज्यात राज्यपाल राजवट आणावी.- गुलाम नबी आझाद,काँग्रेसचे नेते>भाजपा-पीडीपी यांच्या संधीसाधू युतीने काश्मीरमध्ये आग भडकवली. त्यात अनेक निरपराध नागरिकांना प्राणास मुकावे लागले व आपल्या शूर सैनिकांना हौतात्म्य आले. संपुआ सरकारने केलेल्या कामावर या आघाडीने पाणी फिरविले. राज्यपाल राजवटीतही हे नुकसान सुरूच राहील. अकार्यक्षमता, मग्रुरी व द्वेष यांचा नेहमीच पराभव होत असतो.- राहुल गांधी,काँग्रेस अध्यक्ष>विधानसभा बरखास्त करून राज्यात ताबडतोब निवडणुका घेण्यात याव्यात, अशी आमची मागणी आहे. तसे आपण राज्यपालांना भेटून सांगितले आहे.- ओमर अब्दुल्ला,नॅशनल कॉन्फरन्सचे नेते>चिंता अपयश झाकण्याचीचकाश्मीरमधून होणारे हल्ले वाढले, दहशतवादी हल्ल्यात वाढ झाली, त्यात असंख्य जवान शहीद झाले आणि सामान्य निरपराध नागरिकही मारले गेले. या साºयाचे खापर आपल्यावर फुटू नये, असे भाजपाला वाटत होते.पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होत असल्याने, काश्मीर प्रश्नावर आपण अयशस्वी ठरलो, असा शिक्का भाजपाला नको होता. त्यातून पीडीपी व भाजपा यांच्यातील बेबनाव वाढत होता.कथुआ बलात्कार घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लाल झेंडा फडकवला. अपयशी शस्त्रसंधीने पीडीपीचा पाठिंबा काढून घेण्यास भाजपाला कारण मिळाले व संपादक शुज्जात बुखारी यांच्या हत्येने सरकार जाणार हे निश्चित झाले. मोदी यांनीच आघाडी घडवून आणली होती व ती तोडलीही त्यांनीच.

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती