शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

चित्रपटानंतर महात्मा गांधींना जगभरात ओळख मिळाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 14:53 IST

"आपण ७५ वर्षांत काहीही केले नाही"

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: “राष्ट्रपिता महात्मा गांधींचे विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आपण ७५ वर्षांत काहीही केले नाही. त्यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनला, तेव्हा जगभरात त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. त्यापूर्वी त्यांना कोणी ओळखत नव्हते,” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.

पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले, “महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्त्व होते. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षांत काहीही केले नाही.”

अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात आहे

“जगभरात जर मार्टीन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांची स्वतंत्र ओळख आहे. महात्मा गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. मी संपूर्ण जग फिरलो. मात्र, गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. आज जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात आहे,” असेही ते म्हणाले.

घुसखोरीमुळे सीमावर्ती भागात लोकसंख्या संरचना बदलत आहे

घुसखोरीमुळे पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातील लोकसंख्येची संरचना बदलत आहे, तर घुसखोर स्थानिक तरुणांसाठी असलेल्या संधी हिरावून घेत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काकद्वीप येथील प्रचारादरम्यान केला.

बंगालच्या सीमावर्ती भागातील लोकसंख्या बदलली जात आहे. टीएमसी धार्मिक छळ झालेल्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याच्या विरोधात आहे. ते सीएएला एवढा विरोध का करत आहेत? हे लोक (टीएमसी नेते) सीएएबद्दल खोटे का बोलत आहेत? बेकायदेशीर घुसखोर प. बंगालमध्ये स्थायिक व्हावेत यासाठी टीएमसी तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला.

महात्मा गांधींबद्दल जाणून घेण्यासाठी केवळ ‘संपूर्ण राज्यशास्त्र’च्या विद्यार्थ्यालाच चित्रपट पाहण्याची गरज पडली असेल.- राहुल गांधी, काँग्रेस नेते

ज्यांचे वैचारिक पूर्वज नथुराम गोडसेसह महात्मा गांधींच्या हत्येत सहभागी होते, ते बापूंनी दिलेल्या सत्याच्या मार्गावर कधीच चालू शकणार नाहीत. आता खोटेपणा आपला बाडबिस्तरा गुंडाळून निघून जाणार आहे.- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत