पाच राज्यांत बर्ड फ्लूमुळे महाराष्ट्रही झाला सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 05:46 AM2021-01-10T05:46:57+5:302021-01-10T05:47:21+5:30

विषाणूचे माणसांत संक्रमण होण्याची भिती

Maharashtra was also alerted due to bird flu in five states | पाच राज्यांत बर्ड फ्लूमुळे महाराष्ट्रही झाला सतर्क

पाच राज्यांत बर्ड फ्लूमुळे महाराष्ट्रही झाला सतर्क

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : देशात केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा व हिमाचल प्रदेशमध्ये बर्ड फ्लूची साथ आली असून, महाराष्ट्रामध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पक्ष्यांतूनच बर्ड फ्लूच्या विषाणूचे माणसांत संक्रमण होण्याची शक्यता असल्याने व या आजाराने मरण पावलेल्यांचे प्रमाणही अधिक असल्यामुळे देशात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आधीच सारे जग कोरोना साथीच्या विळख्यात सापडले असताना, आता बर्ड फ्लूने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोंबड्या व अंड्यांच्या किमती गेल्या काही दिवसांत घसरल्या आहेत. चीनमध्ये १९९६ साली सर्वप्रथम बर्ड फ्लूची लागण झाली होती. त्यानंतर, आजतागायत जगातील विविध भागात बर्ड फ्लूची साथ डोक वर काढत असते. २००६ मध्ये महाराष्ट्रात नंदूरबार येथे बर्ड फ्लू पसरला होता. बर्ड फ्लूच्या विषाणूचे माणसामध्ये संक्रमण झाल्यानंतर पहिला रुग्ण हाँगकाँगमध्ये १९९७ साली सापडला होता.

पंजाब : कोंबड्यांची आयात बंदी
चंदीगड : बर्ड फ्लूची साथ पंजाबमध्ये पसरू नये, म्हणून तेथील राज्य सरकारने अन्य राज्यांतून कोंबड्या, तसेच इतर पाळीव पक्षी आयात करण्यास १५ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. पंजाबशेजारील हरयाणा, हिमाचल प्रदेशमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव झाल्यामुळे पंजाब सरकार सतर्क झाले होते. या साथीचा लवलेशही पंजाबमध्ये नसला, तरी तेथील राज्य सरकार कोणताही धोका स्वीकारण्यास तयार नाही.

Web Title: Maharashtra was also alerted due to bird flu in five states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.