शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘आयुष्यमान’साठी महाराष्ट्र अनुत्सुक! मोदींच्या महत्त्वाकांक्षेला स्वपक्षीय खो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 04:50 IST

देशातील १० कोटी गरीब कुटुंबांना अल्पदरात आरोग्यविमा देण्यासाठी केंदातील मोदी सरकारने जाहीर केलेली ‘आयुष्यमान भारत’ योजना राबविण्यास महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन भाजपाशासित राज्यांनीच अनुत्सुकता दर्शविल्याचे कळते.

नवी दिल्ली - देशातील १० कोटी गरीब कुटुंबांना अल्पदरात आरोग्यविमा देण्यासाठी केंदातील मोदी सरकारने जाहीर केलेली ‘आयुष्यमान भारत’ योजना राबविण्यास महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन भाजपाशासित राज्यांनीच अनुत्सुकता दर्शविल्याचे कळते.विम्याचा अल्प हप्ता प्रत्येक कुटुंबाला वर्षाला पाच लाख रुपयांचा आरोग्यविमा देण्याची ही योजना आहे. राज्यांनी ही योजना राबवावीच असे बंधन नाही. इच्छुक राज्यांनी त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी सामजस्य करार करायचा आहे. योजनेचा निम्मा खर्च ही राज्यांनी करायचा आहे. आत्तापर्यंत २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी असे करार केले आहेत.या योजनेचे काम पाहणाऱ्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यांनी या योजनेला विरोध केलेला नाही. मात्र याहूनही अधिक लोकांना लाभ देणाºया स्वत:च्या योजना सुरु असताना मध्येच ही केंद्रीय योजना स्वीकारायला ही राज्ये उत्सुक नाहीत.महाराष्ट्र सरकार स्वत:ची ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ आधीपासूनच राबवित आहे. या योजनेत २.२ कोटी नागरिकांना वर्षाला दोन लाखांपर्यंतचा आरोग्यविमा दिला जातो. ही योजना बंद करणे योग्य होणार नाही व त्यासोबत केंद्राची योजनाही राबवायचे म्हटले तर त्यासाठी निधी नाही, असे महाराष्ट्राचे म्हणणे असल्याचे या अधिकाºयाने सांगितले.राजस्थान सरकारच्या अनुसुक्ततेचे कारणही तसेच आहे. त्यांच्याकडे राज्य सरकारची ‘भामाशहा स्वास्थ्य विमा योजना’ सुरु आहे. त्यात सुमारे ४.५ कोटी लोकांना विनामूल्य आरोग्यविमा दिला जातो. शिवाय ‘आयुष्यमान योजने’साठी विमा कंपनीशी आता करार केला तर तो पुढील वर्षापर्यंत असेल. त्यामुळे सध्या सुरु अससेल्या राज्यातील योजनेला खीळ न घालता नवी योजना कितपत स्वीकारता येईल, याविषयी राज्य सरकार साशंक आहे. ‘आयुष्यमान भार’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदू भूषण यांनी अलिकडेच या संदर्भात राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याशी चर्चाही केली.आमची स्वत:ची याहून अधिक लोकांना लाभ देणारी ‘बिजू स्वास्थ्य कल्याण योजना’ आधीपासून सुरु आहे, असेच कारण देऊन ओडिशा सरकारने केंद्राची योजना राबविण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पंजाब आणि दिल्ली या दोन राज्यांचा अद्याप निर्णय व्हायचा आहे. मात्र राजकीय मतभेद असूनही ममता बॅनर्जी यांचे प. बंगाल सरकार केंद्राची योजना राबविण्यास तयार झाले हे विशेष.१५ आॅगस्टचा मुहूर्त?संपूर्ण देशात येत्या १५ आॅगस्टपासून ही योजना राबविली जावी, यासाठी मोदी सरकारचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील ८.०३ कोटी व शहरी भागांतील २.३३ कोटी कुटुंबे यासाठीचे संभाव्य ‘टार्गेट’ आहे. राज्यांची संमती घेऊन त्यांच्याशी औपचारिक करार करण्याचे काम जवळजवळ पूर्ण होत आल्याचे योजना राबविण्यासाठी नेमलेल्या राष्ट्रीय आरोग्य एजन्सी या शीर्षस्थ संस्थेने योजनेत सहभागी होणाºया सरकारी व खासगी इस्पितळांची नोंदणी करण्याचे काम सुरु केले आहे.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र