शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

Maharashtra Politics: म्हणून सत्तांतराच्या खेळीसाठी भाजपने ‘होमपीच’ बदलली, गुजरातऐवजी गुवाहाटी केंद्रस्थानी आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 09:41 IST

Maharashtra Politics: गुजरातमधूनच महाराष्ट्रातील नव्या सरकारची मुहूर्तमेढ करण्याचा डाव होता; मात्र ऐनवेळी बदललेल्या राजकीय हवामानाने विरोधकांचे बाऊन्सर व गुगलीने विकेट पडण्याची भीती लक्षात घेता सर्व प्रकारची खबरदारी घेत या खेळीसाठी गुजरातची ‘पीच’ बदलून आसाममधील गुवाहाटीत हा खेळ खेळण्याचा भाजपने निर्णय घेतल्याची चर्चा आता राजकीय गोटात रंगली आहे.

- रमाकांत पाटील सुरत : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पुरस्कृत सरकार स्थापण्याच्या खेळीसाठी भाजपने खरं तर गुजरातच्या ‘होमपीच’ची निवड केली होती. गुजरातमधूनच महाराष्ट्रातील नव्या सरकारची मुहूर्तमेढ करण्याचा डाव होता; मात्र ऐनवेळी बदललेल्या राजकीय हवामानाने विरोधकांचे बाऊन्सर व गुगलीने विकेट पडण्याची भीती लक्षात घेता सर्व प्रकारची खबरदारी घेत या खेळीसाठी गुजरातची ‘पीच’ बदलून आसाममधील गुवाहाटीत हा खेळ खेळण्याचा भाजपने निर्णय घेतल्याची चर्चा आता राजकीय गोटात रंगली आहे.

विधान परिषदेच्या मतमोजणीत सर्वच राजकीय पक्ष दंग असताना शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदार व मंत्र्यांसह बंडाचा झेंडा घेत गुजरातच्या दिशेने रवाना झाले. या आमदारांच्या पाहुणचारासाठी गुजरातमधील प्रशासन व भाजपचे नेते यापूर्वीच सक्रिय झाले होते. बलसाड येथे तर गुजरातमधील भाजपचा बडा नेता या आमदारांच्या स्वागतासाठी थांबले होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढे या सर्व आमदार व मंत्र्यांनी सुरत येथील हॉटेल गाठले आणि तेथेच मुक्काम ठोकला. बाहेर कुणाला कुणकुण लागण्यापूर्वीच हॉटेलमध्ये सर्व डावपेच ठरले आणि त्यानंतर गुजरातमधील भाजपचे नेते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. सकाळी याबाबत मीडियाला चुणूक लागताच सर्व महाराष्ट्रातील राजकीय नेते जागे झाले आणि आमदारांची शोधाशोध सुरू झाली. तोपर्यंत पाणी वाहून गेले होते.

काय होते नियोजन?गुजरातमध्ये एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक आमदार दाखल झाल्यानंतर नवीन सरकार स्थापण्याची पूर्ण प्रक्रिया केल्यानंतरच गुजरात सोडण्याचे नियोजन होते. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरत येथून या सर्व आमदारांना मंगळवारी दुपारीच गुजरातमधील आनंद, अहमदाबाद किंवा गांधीनगर या तीन ठिकाणी हलविण्याचे नियोजन होते. त्यासाठी आनंद व अहमदाबाद येथे हॉटेल आणि रिसोर्टचे बुकिंगही करण्यात आले होते. याचठिकाणी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदारांना आणण्यात येणार होते. तेथेच संख्याबळाचे व मंत्रिमंडळातील खाते वाटपाची जुळवाजुळव करून नवीन सरकार स्थापन करण्याची मुहूर्तमेढ रोवण्यात येणार होती. 

का बदलले ठिकाण? जसजसा दिवस पुढे जात होता तसतशा राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. खास करून शिवसेनेने भाजपवर थेट आरोप करीत गुजरातमधील भाजप सरकारचा फायदा घेत व केंद्राच्या दबावाने हे सर्व घडत असल्याचे सांगितले. याशिवाय सुरत येथे हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या एका आमदाराच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारी वाढण्याची शक्यता लक्षात घेत आणि काही महिन्यातच होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर त्याचे राजकीय परिणाम होऊ नये शिवाय महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे खापर भाजपचे होमपीच असलेल्या गुजरातवर येऊ नये या सर्व बाबींचा विचार करीत सायंकाळी उशिरा आमदारांना गुजरातमधून गुवाहाटीत हलविण्याचा निर्णय झाला.

टॅग्स :BJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना