शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"काँग्रेसकडे तर एकच नाथ, बाकी पूर्ण काँग्रेस अनाथ, बिचारे उद्धव..."; भाजपाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:29 IST

Shivraj Singh Chouhan And KamalNath : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली -  राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय देवेंद्र फडणवीसांना कळवण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. यानंतर आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan) यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसही अतिशय अजब आहे. जो व्यक्ती स्वतःचं सरकार वाचवू शकला नाही (कमलनाथ), त्याला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी पाठवलं होतं. हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे असंच त्यांनीही केलं आणि बिचारे उद्धव ठाकरेही गेले. मला काँग्रेस आणि कमलनाथ दोघांच्याही विचाराची कीव येते. ना विकास करतात, ना लोकांचं कल्याण करतात. काँग्रेसकडे तर एकच नाथ आहेत, बाकी पूर्ण काँग्रेस अनाथ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देवेंद्र फडणवीस नाराज आहेत अशी चर्चा जोरदार रंगली होती. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार (BJP Sudhir Mungantiwar) यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस नाराज होते का? आणि दिल्लीमध्ये नेमक्या कोणत्या हालचाली झाल्या? य़ावर भाष्य केलं आहे. "भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सत्तेसाठी कधीच काम करत नाही. देवेंद्रजी यांचं मन विशाल आहे. राज्यामध्ये प्रगतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पाठीशी देवेंद्रजी यांनी आपला अनुभव उभा करावा हीच यामागची भावना आहे" असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील हाच निर्णय होता, तो निर्णय बदलला नाही. त्या निर्णयाला उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील ही जोड देण्यात आली. त्यामुळे कोणताच निर्णय बदलला नाही. फडणवीस सुरुवातीला सत्तेच्या बाहेर जाऊन आपला अनुभव शेअर करणार होते. पण राष्ट्रीय अध्यक्षांनी आग्रह केला, त्यांनी सांगितलं की, तुमचा पाच वर्षांचा विकासाचा, प्रगतीचा, राज्याच्या विकासाच्या गतीचा जो अनुभव आहे तो त्यांच्या पाठीशी असावा. व्यक्तिगत निर्णय या पक्षात होत नाहीत. नेतृत्व जे विचारपूर्वक सांगतं त्यावर आम्ही अमलबजावणी करतो. राज्यामध्ये प्रगतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पाठीशी देवेंद्रजी यांनी आपला अनुभव उभा करावा हीच यामागची भावना आहे" असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानcongressकाँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ