शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

सर्वोच्च न्यायालयात रंगला साडे तीन तास युक्तीवाद; काय घडले? 9 वाजता निकाल येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 20:47 IST

सत्ता मिळविण्यासाठी कायद्याची थट्टा, रामेश्वर प्रसाद खटल्याचा दाखला दिला. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा न करता अचानक बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला, असेही सिंघवी म्हणाले. सुमारे ५० मिनिटे सिंघवींचा युक्तीवाद चालला. 

शिवसेनेच्या वकिलांनी बहुमत चाचणी आठवडाभर पुढे ढकलावी असा युक्तीवाद केला आहे, तर शिंदे गट आणि राज्यपालांच्या वकिलांनी बहुमत चाचणी लोकशाहीसाठी कशी महत्वाची हे म्हटले आहे. यानंतर सुमारे साडे तीन तास चाललेला हा युक्तीवाद साडे आठच्या सुमारास संपला. सर्वोच्च न्यायालय यावर रात्री ९ वाजता निकाल जाहीर करणार आहे. बहुमत चाचणी होणार की पुढे ढकलली जाणार, हे थोड्याच वेळात ठरणार आहे. 

बहुमत चाचणीला सर्व आमदार उपस्थित हवेत, तेव्हाच ही चाचणी होऊ शकते. आम्हाला आजच हे पत्र मिळाले. राज्यपालांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून काम करायचे नसते. राज्यपालांच्या प्रत्येक निर्णयाची कायदेशीर तपासणी होऊ शकते. राज्यपालांनी शिंदे गटाचे पत्र का तपासले नाही. ११ जुलैला बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी आहे, तोवर राज्यपाल थांबू शकले नसते का? असा युक्तीवाद शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.

सत्ता मिळविण्यासाठी कायद्याची थट्टा, रामेश्वर प्रसाद खटल्याचा दाखला दिला. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा न करता अचानक बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला, असेही सिंघवी म्हणाले. सुमारे ५० मिनिटे सिंघवींचा युक्तीवाद चालला. 

यानंतर शिंदेगटाच्या बाजुने नीरज किशन कौल यांच्याकडून युक्तीवाद सुरु झाला. विधान सभा उपाध्यक्ष पदावर राहतील की नाही, हा निर्णय महत्वाचा. बहुमत चाचणी ही लोकशाही मजबूत करणारी गोष्ट. उद्याच बहुमत चाचणी घेतली नाही तर घोडेबाजार होईल, आमदारांचे करिअर धोक्यात येईल. बहुमताचा निर्णय घेणे हा राज्यपालांचा अधिकार, तो एवढा आक्षेपार्ह आहे का? आधी बहुमत चाचणी होऊद्या, नंतर अन्य निर्णय घ्या, अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांची सर्वोच्च न्यायालयाकडे केली. अविश्वास प्रस्ताव असलेले विधानसभा उपाध्यक्ष आमदारांना नोटीस कशी देऊ शकतात, आधी त्यांच्यावर निर्णय होऊद्या, असेही ते म्हणाले. 

यानंतर राज्यपालांच्या बाजुने राज्यपालांचे वकील मनिंदर सिंह आणि मेहता यांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी  बहुमत चाचणी बोलविण्यासाठी राज्यपालांना कोणाच्याही सूचनेची गरज नाही. बहुमत चाचणी घ्या, बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचा तो नैसर्गिक अधिकार आहे. 39 आमदारांच्या जिवाला धोका होता, संजय राऊत यांचे वक्तव्य दुर्लक्ष करण्यासारखे नाहीय. आमदारांच्या जिवाला धोका होता, त्यामुळे राज्यपाल दुर्लक्ष करू शकत नव्हते, असा युक्तीवाद करण्यात आला. सुमारे तीन तास हा युक्तीवाद सुरु होता. यानंतर पुन्हा शिवसेनेचे वकील सिंघवी यांनी प्रतियुक्तीवाद केला. अध्यक्ष चुकू शकतात, पण राज्यपाल नाहीत का? राज्यपाल पवित्र गाय आहेत का? असा सवाल केला. नेहमी अध्यक्षांच्या अधिकारांवर आक्षेप का? अध्यक्षांना अधिकार दिल्यानंतरच बहुमत चाचणी घ्यावी. यासाठी आठवड्याची मुदत द्यावी, अशी मागणी सिंघवी यांनी केली.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना