शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकार कोसळणे भाजपाच्या पथ्थ्यावर, राष्ट्रपती निवडणुकीपासून लोकसभेपर्यंत फायदाच फायदा, असं आहे समिकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 13:35 IST

सत्ता बदलामुळे राज्यातील समिकरणे मोठ्या प्रमामात बदलणार असून, महाविकास आघाडी सरकार कोसळणे भाजपाच्या पथ्थ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.

मुंबई - शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर अखेर उद्धव ठाकरे यांना काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्याबरोबरच गेल्या अडीच वर्षांपासून राज्याच्या सत्तेवर असलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडी सरकारही कोसळले. मविआ सरकार कोसळल्याने आता राज्यात एकनाथ शिंदे गटाच्या पाठिंब्याने देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. या सत्ता बदलामुळे राज्यातील समिकरणे मोठ्या प्रमामात बदलणार असून, महाविकास आघाडी सरकार कोसळणे भाजपाच्या पथ्थ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रातील सत्तांतरामुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी मिळाली आहे. सध्या लोकसभेमध्ये तब्बल १६८ खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार अशा तीन राज्यात भाजपाचं सरकार सत्तेवर आहे. त्यातच लोकसभा निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढण्यासाठी भाजपाने महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू केली आहे. २०१९ मध्ये या तिन्ही राज्यातून भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांनी १६८ पैकी १४४ जागा जिंकल्या होत्या. आता २०२४ मध्ये त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.

देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी दिली आहे. तर विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना संयुक्तरीत्या उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीमध्ये भाजपाला काही मते कमी पडत होती. मात्र आता महाराष्ट्रात सत्ता समिकरणं बदलल्याने भाजपाचे समर्थन असलेल्या उमेदवाराला अधिकची मतं मिळणार आहे.

राजकारणामध्ये परस्पर विरोधी विचारांच्या आघाड्यांची सरकारं फार काळ टिकत नाहीत. हल्लीचा इतिहास पाहिल्यास २०१५ मध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाची आघाडी झाली होती. मात्र दोन वर्षांतच ते सरकार कोसळले होते. तर २०१९ मध्ये महराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी झाली. मात्र  या आघाडीत सुरुवातीपासून अनेक मतभेद होते. पण बाहेर सारं काही आलबेल असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर शिवसेनेतील बंडखोरीमुळे हे सरकार पडले.

दरम्यान, राज्यात झालेल्या सत्तापरिवर्तनाचा आणि शिवसेनेतील बंडाळाचा परिणाम काही दिवसांनी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही दिसणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आधीपासूनच कंबर कसली आहे. त्यात आता शिवसेना बंडखोरीमुळे कमकुवत झाल्याने त्याचाही फायदा भाजपाला होणार आहे. त्यामुळे मुंबईत स्वबळावर जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका