शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ठाकरे सरकार कोसळणे भाजपाच्या पथ्थ्यावर, राष्ट्रपती निवडणुकीपासून लोकसभेपर्यंत फायदाच फायदा, असं आहे समिकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 13:35 IST

सत्ता बदलामुळे राज्यातील समिकरणे मोठ्या प्रमामात बदलणार असून, महाविकास आघाडी सरकार कोसळणे भाजपाच्या पथ्थ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.

मुंबई - शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर अखेर उद्धव ठाकरे यांना काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्याबरोबरच गेल्या अडीच वर्षांपासून राज्याच्या सत्तेवर असलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडी सरकारही कोसळले. मविआ सरकार कोसळल्याने आता राज्यात एकनाथ शिंदे गटाच्या पाठिंब्याने देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. या सत्ता बदलामुळे राज्यातील समिकरणे मोठ्या प्रमामात बदलणार असून, महाविकास आघाडी सरकार कोसळणे भाजपाच्या पथ्थ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रातील सत्तांतरामुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी मिळाली आहे. सध्या लोकसभेमध्ये तब्बल १६८ खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार अशा तीन राज्यात भाजपाचं सरकार सत्तेवर आहे. त्यातच लोकसभा निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढण्यासाठी भाजपाने महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू केली आहे. २०१९ मध्ये या तिन्ही राज्यातून भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांनी १६८ पैकी १४४ जागा जिंकल्या होत्या. आता २०२४ मध्ये त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.

देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी दिली आहे. तर विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना संयुक्तरीत्या उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीमध्ये भाजपाला काही मते कमी पडत होती. मात्र आता महाराष्ट्रात सत्ता समिकरणं बदलल्याने भाजपाचे समर्थन असलेल्या उमेदवाराला अधिकची मतं मिळणार आहे.

राजकारणामध्ये परस्पर विरोधी विचारांच्या आघाड्यांची सरकारं फार काळ टिकत नाहीत. हल्लीचा इतिहास पाहिल्यास २०१५ मध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाची आघाडी झाली होती. मात्र दोन वर्षांतच ते सरकार कोसळले होते. तर २०१९ मध्ये महराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी झाली. मात्र  या आघाडीत सुरुवातीपासून अनेक मतभेद होते. पण बाहेर सारं काही आलबेल असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर शिवसेनेतील बंडखोरीमुळे हे सरकार पडले.

दरम्यान, राज्यात झालेल्या सत्तापरिवर्तनाचा आणि शिवसेनेतील बंडाळाचा परिणाम काही दिवसांनी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही दिसणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आधीपासूनच कंबर कसली आहे. त्यात आता शिवसेना बंडखोरीमुळे कमकुवत झाल्याने त्याचाही फायदा भाजपाला होणार आहे. त्यामुळे मुंबईत स्वबळावर जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका