शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

महाराष्ट्रात 15 जिल्ह्यांत रोज शंभरावर रुग्ण, १७ राज्यांत ७३ जिल्ह्यांत संसर्ग दर १०% पेक्षा जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 11:49 IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार १४ राज्यांतील या जिल्ह्यांत दररोज शंभराहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे.

नितीन अग्रवाल -नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत असले तरी, देशातील ९१ जिल्ह्यांत अजूनही संसर्गाचा धोका आहे. यात महाराष्ट्रातील १५ जिल्हे आहेत.  एकूण ८० टक्के रुग्ण याच जिल्ह्यांत आढळत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार १४ राज्यांतील या जिल्ह्यांत दररोज शंभराहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. यात महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील सर्वाधिक १५-१५ जिल्ह्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त  केरळमधील १४, ओडिशाचे ११, आंध्र प्रदेशमधील १०, आसामचे ९ आणि कर्नाटकच्या ६ जिल्ह्यांचाही समावेश आहे. ४ मे रोजी संपलेल्या आठवड्यात अशा जिल्ह्यांची संख्या ४४० होती.कोरोना प्रतिबंधक लसीच्या अतिरिक्त (बुस्टर) डोसबाबत विचारले असता भार्गव यांनी सांगितले की, हा मुद्दा विचाराधीन आहे.  लसीचा प्रभाव किती दिवस असेल, याची पूर्ण माहिती सध्या नाही.  किती दिवस ॲन्टीबॉडी टिकतात, ही माहिती खूप महत्त्वपूर्ण असेल. असे मानले जाते की, कोरोनाचा संसर्ग झाल्यास ७ ते १२ महिन्यांपर्यंत ॲन्टीबॉडी राहतात.  लसीच्याबाबतीत हा अवधी किती असेल, याची माहिती कळायची आहे.आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशभरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १० मे ३७ लाखांहून कमी होऊन ४.६४ लाखांवर आली. रुग्ण बरे होण्याचा दर ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ८१.८ टक्के होता, तो वाढून  ९७.२ टक्के झाला आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अनेक भागात कोरोना निर्बंध शिथिल केले जात असताना कोरोनासंबंधीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.

१७ राज्यांतील ७३ जिल्ह्यांत धोका-    कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी जरूर होत आहे. परंतु, अजूनही १७ राज्यांतील ७३ जिल्ह्यांतील संसर्गाचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे. यात सर्वाधिक जिल्हे अरुणाचल प्रदेशातील  आहेत. त्यानंतर राजस्थानचे १०, मणिपूरचे ९, केरळचे ७, मेघालयातील ९ जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. -    याशिवाय त्रिपुरा आणि सिक्कीममधील प्रत्येकी चार, ओडिशा आणि नागालँडमधील प्रत्येकी ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील फक्त एकाच जिल्ह्यात हा दर १० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

३३ हजारांहून अधिक लोकांचा सहभाग असलेल्या सर्वेक्षणानुसार असे आढळले की, २४ टक्के लोक मास्क लावत नाहीत. ४५ टक्के लोक योग्यप्रकारे मास्क लावत नाही. तसेच मास्क लावणाऱ्या लोकांची संख्या फक्त २९ टक्के आहे. ११ टक्केच लोक सोशल डिस्टन्सिंगचे पालन  करीत असल्याचे आढळले.  लसीकरण केंद्रावर ४४ टक्के आणि प्रवासात केवळ १५ टक्केच लोकांनी कोरोना नियमांचे पालन केले, असे अग्रवाल यांनी सांगितले.

५९५ जिल्ह्यांतील संसर्ग दर पाच टक्क्यांपेक्षा कमीभारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) प्रमुख बलराम भार्गव यांनी सांगितले की, ६५ जिल्ह्यांतील लोकांंना संसर्ग होण्याचा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. ५९५ जिल्ह्यांतील दर ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, हे चांगले संकेत आहेत. परंतु, ज्या ठिकाणी संसर्ग दर ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्या ठिकाणी खबरदारी घेत उपाययोजना करणे जरुरीचे आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस