शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत महाराष्ट्र; दापोली दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 05:55 IST

आंबेनळी घाटातील दरीत बस कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी लोकसभेत सोमवारी केली.

नवी दिल्ली : आंबेनळी घाटातील दरीत बस कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी लोकसभेत सोमवारी केली. मात्र सरकारने त्यावर कोणतेही आश्वासन दिले नाही. सारे कर्मचारी दापोली कोकण कृषी विद्यापीठातले होते.या अपघाताची माहिती देतांना सावंत म्हणाले की, ठार झालेले सारेजण ३५ ते ४५ वयाचे आहेत. त्यांची मुले १० ते १५ वर्षे वयोगटातील आहेत. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी, असे सावंत म्हणाले.दमणगंगेचे पाणी चार धरणांत सोडानाशिक जिल्ह्यातील शेतीला मुबलक पाणी मिळावे यासाठी दमणगंगेचे पाणी एकदरे, वाघाड, करंजवण व ओझरखेड धरणांमध्ये सोडण्याची विनंती दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली. ते म्हणाले की दमणगंगेला गोदावरीशी जोडण्यासाठी पाहणी झाली आहे. तथापि दिंडोरी मतदारसंघात नांदगाव, येवला व चांदवडमध्ये बहुसंख्य शेतांना पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे दमणगंगेचे पाणी वरील चार  धरणांना जोडल्यास टंचाई दूर होईल.भीमाशंकरसाठी प्रस्तावच नाहीभगवान शंकराचे स्थान व १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकासासाठी केंद्राकडून निधी मिळण्यास राज्य सरकारच्या प्रस्तावाची प्रतीक्षा आहे. असे उत्तर केंद्रीय पर्यटनमंत्री अल्फान्सो यांनी शिरूरचे शिवाजीराव आढळराव यांना दिले. त्र्यंबकेश्वरप्रमाणेच  भीमाशंकरलाही केंद्राने निधी द्यावा, अशी अढळराव पाटील यांची मागणी होती. पर्र्यटनमंत्री म्हणाले की  निधी देण्यास  हरकत नाही, मात्र राज्याकडून त्यासाठी प्रस्ताव आलेला नाही.अंधेरी पुलाचा प्रश्न संसदेत गाजला  अंधेरीत रेल्वे पूल दुर्र्घटनेस जबाबदार कोण, असा प्रश्न काँग्रेसचे डॉ. सुबीरामी रेड्डी यांनी  विचाला. पूल कोसळण्यास जबाबदार असलेल्यांचा शोध घेण्यासाठी समिती नेमली असून, तिचा  अहवाल लवकरच मिळेल, असेही रेल्वे खात्याने लेखी उत्तरात म्हटले आहे. मुंबईतील सर्व रेल्वे पुलांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मुंबई आयआयटीच्या सहकार्याने पुलांचे आॅडिट केले जाईल.  देशभरातील रेल्वेच्या पुलांची पाहणी वर्षातून दोनदा होते. पुलांची दुरूस्ती, देखभाल, मजबूत करण्यासाठी प्रक्रिया, नव्या पुलाच्या उभारणीवर रेल्वेचे विशेष लक्ष असल्याचा दावा रेल्वेमंत्र्यांनी लेखी उत्तरात केला आहे.३७४८ पुलांची दुरुस्तीगेल्या पाच वर्षात देशात रेल्वेच्या ३ हजार ७४८ पुलांची दुरुस्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत १ एप्रिल २०१८ पर्यंत ४ हजार २७ पुलांच्या दुरुस्ती, देखभालीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र निधी वितरित करण्यात आल्याचे उत्तरात म्हटले आहे.

टॅग्स :ParliamentसंसदMaharashtraमहाराष्ट्रSatara Bus Accidentसातारा बस अपघात