शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

लोकसभेत महाराष्ट्र; दापोली दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 05:55 IST

आंबेनळी घाटातील दरीत बस कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी लोकसभेत सोमवारी केली.

नवी दिल्ली : आंबेनळी घाटातील दरीत बस कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी लोकसभेत सोमवारी केली. मात्र सरकारने त्यावर कोणतेही आश्वासन दिले नाही. सारे कर्मचारी दापोली कोकण कृषी विद्यापीठातले होते.या अपघाताची माहिती देतांना सावंत म्हणाले की, ठार झालेले सारेजण ३५ ते ४५ वयाचे आहेत. त्यांची मुले १० ते १५ वर्षे वयोगटातील आहेत. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी, असे सावंत म्हणाले.दमणगंगेचे पाणी चार धरणांत सोडानाशिक जिल्ह्यातील शेतीला मुबलक पाणी मिळावे यासाठी दमणगंगेचे पाणी एकदरे, वाघाड, करंजवण व ओझरखेड धरणांमध्ये सोडण्याची विनंती दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली. ते म्हणाले की दमणगंगेला गोदावरीशी जोडण्यासाठी पाहणी झाली आहे. तथापि दिंडोरी मतदारसंघात नांदगाव, येवला व चांदवडमध्ये बहुसंख्य शेतांना पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे दमणगंगेचे पाणी वरील चार  धरणांना जोडल्यास टंचाई दूर होईल.भीमाशंकरसाठी प्रस्तावच नाहीभगवान शंकराचे स्थान व १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकासासाठी केंद्राकडून निधी मिळण्यास राज्य सरकारच्या प्रस्तावाची प्रतीक्षा आहे. असे उत्तर केंद्रीय पर्यटनमंत्री अल्फान्सो यांनी शिरूरचे शिवाजीराव आढळराव यांना दिले. त्र्यंबकेश्वरप्रमाणेच  भीमाशंकरलाही केंद्राने निधी द्यावा, अशी अढळराव पाटील यांची मागणी होती. पर्र्यटनमंत्री म्हणाले की  निधी देण्यास  हरकत नाही, मात्र राज्याकडून त्यासाठी प्रस्ताव आलेला नाही.अंधेरी पुलाचा प्रश्न संसदेत गाजला  अंधेरीत रेल्वे पूल दुर्र्घटनेस जबाबदार कोण, असा प्रश्न काँग्रेसचे डॉ. सुबीरामी रेड्डी यांनी  विचाला. पूल कोसळण्यास जबाबदार असलेल्यांचा शोध घेण्यासाठी समिती नेमली असून, तिचा  अहवाल लवकरच मिळेल, असेही रेल्वे खात्याने लेखी उत्तरात म्हटले आहे. मुंबईतील सर्व रेल्वे पुलांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मुंबई आयआयटीच्या सहकार्याने पुलांचे आॅडिट केले जाईल.  देशभरातील रेल्वेच्या पुलांची पाहणी वर्षातून दोनदा होते. पुलांची दुरूस्ती, देखभाल, मजबूत करण्यासाठी प्रक्रिया, नव्या पुलाच्या उभारणीवर रेल्वेचे विशेष लक्ष असल्याचा दावा रेल्वेमंत्र्यांनी लेखी उत्तरात केला आहे.३७४८ पुलांची दुरुस्तीगेल्या पाच वर्षात देशात रेल्वेच्या ३ हजार ७४८ पुलांची दुरुस्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत १ एप्रिल २०१८ पर्यंत ४ हजार २७ पुलांच्या दुरुस्ती, देखभालीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र निधी वितरित करण्यात आल्याचे उत्तरात म्हटले आहे.

टॅग्स :ParliamentसंसदMaharashtraमहाराष्ट्रSatara Bus Accidentसातारा बस अपघात