शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ब्रॉडबॅण्ड जोडणीत महाराष्ट्र अग्रणी; पश्चिम बंगाल खूपच पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 06:11 IST

महाराष्ट्रातील ४३६८१ गावांपैकी २१९७७ ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कने सज्ज असून महाराष्ट्र ब्रॉडबॅण्ड सुविधेत उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील ४३६८१ गावांपैकी २१९७७ ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कने सज्ज असून महाराष्ट्र ब्रॉडबॅण्ड सुविधेत उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशातील ३६०९० गावे ब्रॉडबॅण्डने जोडण्यात आली आहेत; परंतु, महाराष्ट्रातील २१७९४ गावांच्या तुलनेत उत्तर प्रदेशला  आणखी ६७१४९ गावे ब्रॉडबॅण्डने  जोडायची आहेत. याच साधा अर्थ असा की, ३१ मार्च २०२२ पर्यंत उत्तर प्रदेशातील ३३ टक्के गावे ब्रॉडबॅण्डने सज्ज आहेत; तर त्या तुलनेत महाराष्ट्रातील ५० टक्के गावे ब्रॉडबॅण्डने जोडण्यात आली आहेत.

गुजरातमध्ये ७५ टक्के, हरयाणात ९० टक्के आणि पंजाबमधील ८८ टक्के गावे ब्रॉडबॅण्डने जोडण्यात आली आहेत. यात पश्चिम बंगाल मात्र खूपच पिछाडीवर असून या राज्यातील १० टक्के ग्रामपंचायतीत ही सेवा पोहोचली आहे. दळणवळण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार  दिल्लीतील २२२ पैकी एकही गाव ऑप्टिकल फायबरने जोडलेले नाही. चंदीगडमधील सर्व १२ गावांत ही सुविधा उपलब्ध आहे. हरयाणातील ९० टक्के गावे  ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कने जोडण्यात आली आहेत. ओडिशातील ५१२५४ पैकी फक्त १० टक्के गावेही जोडण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये १० टक्के गावे ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कने जोडण्यात आली आहेत. २०२५ पर्यंत देशभरातील उर्वरित ४,६६,४०३ ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कने जोडण्याचे  महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पंतप्रधान मोदी यांनी  निश्चित केले आहे.

१.७२ लाख गावांत फायबर केबल

मार्च २०१६ पासून ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम गतीने केले जात आहे. २०१६ मध्ये ६५४७ गावे ऑप्टिकल फायबर केबलने जोडण्यात आली होती.  मार्च २०१८ मध्ये ही संख्या १.०६  लाख गांवापर्यंत पोहोचली होती, तर २०२२ मध्ये अशा गावांची संख्या १.७२ लाखांपर्यंत गेली. भारत नेट प्रोजेक्टअंतर्गत ६ लाख ३८ हजार गावे ब्रॉडबॅण्डने जोडण्याचा पंतप्रधानांचा मानस आहे. २०२५ पर्यंत  सरकारी योजनांचे शंभर टक्के फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविता यावेत म्हणून हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे दळवळण आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना सांगण्यात आले. 

टॅग्स :InternetइंटरनेटMaharashtraमहाराष्ट्र