शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

महाराष्ट्रात घराणेशाहीचे 'राजकारण' सर्वाधिक; यूपी, बिहारमध्येही 'गादी' चालवणारे जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:41 IST

महाराष्ट्रातील एकूण ४३३ खासदार आणि आमदारांपैकी तब्बल १०८ जण घराणेशाहीतून राजकारणात

नवी दिल्ली: घराणेशाहीला निवडणुकीचा मुद्दा बनवणाऱ्या पक्षांचेच त्याच दलदलीत पाय अडकलेले दिसत आहेत. आतापर्यंत उत्तर भारतात राजकारणात घराणेशाही अधिक असल्याचे मानले जात होते; मात्र देशभरातील विद्यमान खासदार आणि आमदारांचा अभ्यास केल्यानंतर महाराष्ट्र यामध्ये सर्वात पुढे असल्याचे चित्र समोर आले आहे.

महाराष्ट्रातील एकूण ४३३ खासदार आणि आमदारांपैकी तब्बल १०८ जण घराणेशाहीतून राजकारणात आलेले आहेत म्हणजेच जवळपास २५ टक्के प्रतिनिधी 'घराणेशाही'तून पुढे आलेले आहेत. यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. तिथे ६१३ खासदार आणि आमदारांपैकी १३३ (२१.६९ टक्के) आणि बिहारमध्ये ३७४ पैकी ८९ (२३.७९ टक्के) प्रतिनिधी घराणेशाहीशी संबंधित आहेत.

भाजपचे ३८७ तर काँग्रेसचे २८५ नेते घराणेशाहीतले ?

पक्षनिहाय पाहता, भारतीय जनता पक्षाकडे घराणेशाहीतून आलेल्या आमदार-खासदारांची सर्वाधिक संख्या म्हणजेच ३८७ आहे. परंतु त्यांच्या एकूण लोकप्रतिनिधींपैकी हे प्रमाण फक्त १८.६२ टक्के इतके आहेत. दुसरीकडे, काँग्रेसमध्ये घराणेशाहीतून आलेल्या प्रतिनिधींचे प्रमाण भाजपच्या तुलनेत बरेच जास्त आहे. काँग्रेसच्या ८५७ प्रतिनिधींपैकी २८५ जण म्हणजेच ३३.२५ टक्के घराणेशाहीतून आले आहेत. सपात हे प्रमाण ३४.८१ टक्के असून, त्यानंतर जनता दल (यु) ३४.५७ टक्के आहे.

गांधींवरच टीका

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या राज्यसभेच्या खासदार आहेत, सोनिया गांधी या दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी तर दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्नुषा होत. त्यांचे पुत्र म्हणजेच राहुल गांधी रायबरेली लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. तर त्यांची मुलगी खासदार प्रियांका गांधी या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या महासचिव आहेत. तसेच हे तिघेजण कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्यही आहेत. नेहरूंपासून सुरू असलेल्या परंपरेमुळे राजकारणातील घराणेशाहीत गांधी यांचे कुटुंब वरच्या स्थानी असल्याची टीका सातत्याने केली जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Dynasty politics thrives in Maharashtra, followed by UP and Bihar.

Web Summary : Maharashtra leads in dynasty politics, with 25% of representatives from political families. Uttar Pradesh and Bihar follow. The BJP has the highest number of such leaders, but Congress has a higher percentage. The Gandhi family is consistently criticized for perpetuating this trend.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५congressकाँग्रेसBJPभाजपा