शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

महाराष्ट्र, हरियाणात आपला एक टक्काही मते नाहीत; तरीही चिंतेत आहे दिल्ली भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 09:47 IST

भाजपाचे दिल्लीतील नेते मनोज तिवारी यांनी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. महाराष्ट्रात मुंबईपुरता प्रभाव पडेल असे वाटत असले तरीही हरियाणाकडे जास्त लक्ष होते.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तसेच हरियाणामध्येही भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तरीही दिल्लीच्या भाजपाला चिंतेने ग्रासले आहे. कारण दोन्ही राज्यांमध्ये जागा कमी झाल्या आहेत. 

भाजपाचे दिल्लीतील नेते मनोज तिवारी यांनी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. महाराष्ट्रात मुंबईपुरता प्रभाव पडेल असे वाटत असले तरीही हरियाणाकडे जास्त लक्ष होते. मात्र, तिवारी यांच्या सभांचा काही उपयोग झालेला दिसत नाही. तसेच महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी ज्यांच्यासाठी सभा घेतल्या त्या नेत्यांना पराभवाची धूळ चाटावी लागली आहे. हरियाणामध्ये भाजपा बहुमताने जिंकेल अशी अपेक्षाही फोल ठरली आहे. यामुळे दिल्लीच्या कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसू लागला असून त्यांनी आपच्या दोन्ही राज्यांतील कामगिरीला सोशल मिडीयावर ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. काल दिवसभर आपला ट्रोल केले जात होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आप दोन्ही राज्यांमध्ये निवडणूक लढवत होता. या दोन्ही राज्यांमध्ये आपला 1 टक्केही मते मिळाली नाहीत. यावरून भाजपाच्या दिल्लीतील कार्यकर्त्यांनी आपला ट्रोल करण्यास सुरूवात केली होती. 

दिल्लीमध्ये येत्या फेब्रुवारीमध्ये निवडणूक होऊ घातली आहे. येथील नेत्यांना वाटत होते की, हरियाणामध्ये मोठा विजय मिळाला तर दिल्लीमध्ये आपची सत्ता उलथवण्यास मदत होईल. दिल्लीमध्ये भाजपाच्या बाजुने वातावरण तयार होईल. मात्र, दोन्ही राज्यांमध्ये भाजपाच्या जागा घटल्याने आणि नेत्यांच्या सभांना अपयश आल्याने दिल्लीतील कार्यकर्ते निराश झाले आहेत. शेजारच्या राज्यातील निकालांचा दिल्लीतील राजकारणावर परिणाम होण्याची भीती त्यांना सतावू लागली आहे. यामुळेच भाजपाच्या नेत्यांनी या निकालांवरून आपला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. 

भाजपाच्या नेत्यांनी म्हटले की, दोन्ही राज्यांमध्ये आपचा एकही उमेदवार डिपॉझिट वाचवू शकला नाही. आपचे नेते मतदारांना मोफत योजनांचे आमिष दाखवत होते, मात्र त्यांना नाकारले. महाराष्ट्रात आपला 0.12 आणि हरियाणात 0.43 टक्के मते मिळाली. तर भाजपा या दोन्ही राज्यांमध्ये सरकार बनविणार आहे. जर हरियाणामध्ये अशी हालत असेल तर दिल्लीत काय होईल असा टोलाही या नेत्यांनी लगावला आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019haryana election 2019हरियाणा निवडणूकAAPआपBJPभाजपाNew Delhiनवी दिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल