शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

महाराष्ट्र, हरियाणात आपला एक टक्काही मते नाहीत; तरीही चिंतेत आहे दिल्ली भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 09:47 IST

भाजपाचे दिल्लीतील नेते मनोज तिवारी यांनी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. महाराष्ट्रात मुंबईपुरता प्रभाव पडेल असे वाटत असले तरीही हरियाणाकडे जास्त लक्ष होते.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तसेच हरियाणामध्येही भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तरीही दिल्लीच्या भाजपाला चिंतेने ग्रासले आहे. कारण दोन्ही राज्यांमध्ये जागा कमी झाल्या आहेत. 

भाजपाचे दिल्लीतील नेते मनोज तिवारी यांनी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. महाराष्ट्रात मुंबईपुरता प्रभाव पडेल असे वाटत असले तरीही हरियाणाकडे जास्त लक्ष होते. मात्र, तिवारी यांच्या सभांचा काही उपयोग झालेला दिसत नाही. तसेच महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी ज्यांच्यासाठी सभा घेतल्या त्या नेत्यांना पराभवाची धूळ चाटावी लागली आहे. हरियाणामध्ये भाजपा बहुमताने जिंकेल अशी अपेक्षाही फोल ठरली आहे. यामुळे दिल्लीच्या कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसू लागला असून त्यांनी आपच्या दोन्ही राज्यांतील कामगिरीला सोशल मिडीयावर ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. काल दिवसभर आपला ट्रोल केले जात होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आप दोन्ही राज्यांमध्ये निवडणूक लढवत होता. या दोन्ही राज्यांमध्ये आपला 1 टक्केही मते मिळाली नाहीत. यावरून भाजपाच्या दिल्लीतील कार्यकर्त्यांनी आपला ट्रोल करण्यास सुरूवात केली होती. 

दिल्लीमध्ये येत्या फेब्रुवारीमध्ये निवडणूक होऊ घातली आहे. येथील नेत्यांना वाटत होते की, हरियाणामध्ये मोठा विजय मिळाला तर दिल्लीमध्ये आपची सत्ता उलथवण्यास मदत होईल. दिल्लीमध्ये भाजपाच्या बाजुने वातावरण तयार होईल. मात्र, दोन्ही राज्यांमध्ये भाजपाच्या जागा घटल्याने आणि नेत्यांच्या सभांना अपयश आल्याने दिल्लीतील कार्यकर्ते निराश झाले आहेत. शेजारच्या राज्यातील निकालांचा दिल्लीतील राजकारणावर परिणाम होण्याची भीती त्यांना सतावू लागली आहे. यामुळेच भाजपाच्या नेत्यांनी या निकालांवरून आपला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. 

भाजपाच्या नेत्यांनी म्हटले की, दोन्ही राज्यांमध्ये आपचा एकही उमेदवार डिपॉझिट वाचवू शकला नाही. आपचे नेते मतदारांना मोफत योजनांचे आमिष दाखवत होते, मात्र त्यांना नाकारले. महाराष्ट्रात आपला 0.12 आणि हरियाणात 0.43 टक्के मते मिळाली. तर भाजपा या दोन्ही राज्यांमध्ये सरकार बनविणार आहे. जर हरियाणामध्ये अशी हालत असेल तर दिल्लीत काय होईल असा टोलाही या नेत्यांनी लगावला आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019haryana election 2019हरियाणा निवडणूकAAPआपBJPभाजपाNew Delhiनवी दिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल