शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

औटघटकेचे मुख्यमंत्री... कुणी एक दिवसाचा 'राजा', तर कुणी अडीच दिवसांचा 'महाराजा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 19:05 IST

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आला होता. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज (26 नोव्हेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देत भाजपाला धक्का दिला आहे. विश्वासदर्शक ठरावावरील मतदान शक्य तितकं पुढे ढकलण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. मात्र त्यात त्यांना अपयश आलं.

कर्नाटकमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना अवघ्या अडीच दिवसांमध्ये राजीनामा द्यावा लागला होता. सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांना संसदेत बहुमताची चाचणीत यश मिळावायचे होते. मात्र भाजपाला जादूई आकडा गाठता न आल्यामुळे अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे येडियुरप्पा यांच्या नावावर एक विक्रम झाला होता.

 सर्वात कमी कालावधीसाठी पुढील नेत्यांनी सांभाळले मुख्यमंत्रिपद-

1) जगदंबिका पाल -

उत्तर प्रदेशच्या जगदंबिका पाल यांच्या नावावर सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा विक्रम आहे. २१ फेब्रुवारी १९९८ ला राज्यपाल भंडारी यांनी कल्याण सिंह यांचे सरकार बरखास्त करून जगदंबिका पाल यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मात्र पुढच्याच दिवशी राज्यपालांच्या निर्णलाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. उच्च न्यायालयाने राज्यपालांच्या निर्णयाला स्थगिती दिली. विधानसभेत जगदंबिका पाल या बहुमताचा आकडा गाठू शकले नाहीत आणि त्यांना खूर्ची सोडावी लागली. त्यामुळे जगदंबिका पाल यांनीा केवळ एक दिवस मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ सांभाळला.

2) बी.एस. येडियुरप्पा -

कर्नाटकमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना फक्त अडीच दिवसानंतर राजीनामा द्यावा लागला होता. न्यायालयाने येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी कालावधी देण्यात आला होता. मात्र त्यांना बहुमत सिद्ध करण्यास अपयश आल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

3) देवेंद्र फडणवीस - महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आला होता. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज (26 नोव्हेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा कालावधी 79 तास म्हणजेच साडे तीन दिवसांचा होता.

4) सतीश प्रसाद सिंह -

बिहारचे मुख्यमंत्री सतिश प्रसाद सिंह यांना अवघ्या पाच दिवसानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमाना होणारे सतिश प्रसाद सिंह हे पहिले मागासवर्गीय नेते होते.

5) एस.सी. मारक -

सर्वात कमी मुख्यमंत्रीपदाच्या नावाच्या यादीत मेघालयचे नेते एससी मारक यांचाही समावेश आहे. एससी मारक हे फक्त ६ दिवस म्हणजे २७ फेब्रुवारी १९९८ ते ३ मार्च १९९८ पर्यंत मुख्यमंत्रीपदावर होते.

6) शिबू सोरेन -

झारखंडच्या राज्यपालांनी २ मार्च २००५ला शिबू सोरेन यांना अल्पमतात असतानाही सरकार बनवण्याचे आमंत्रण दिले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. परंतु शिबू सोरेन बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठू न शकल्याने दहा दिवसानंतर म्हणजे १२ मार्च २००५ ला त्यांना राजीनामा द्याला लागला होता.

7) जानकी रामचंद्रन -

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांचे २४ डिसेंबर १९८७ला निधन झाल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण यावर निर्णय झाला नाही. पक्षातील आमदारांनी एकत्र येत राज्यापालांना मुख्यमंत्र्यांची पत्नी जानकी रामचंद्रन यांना पाठिंबा असल्याचे पत्र लिहिले. राज्यपाल एसएल खुराना यांनी ७ जानेवारीला जानकी रामचंद्रन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मात्र विधानसभेत त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्याने त्यांना अखेर 24 दिवसानंतर राजीनामा द्यावा लागला होता.

8) बी.पी. मंडल -

बिहारचे मुख्यमंत्री सतिश प्रसाद सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर बीपी मंडल यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारले होते. मात्र त्यांना 31 दिवसानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

9) सी.एच. मोहम्मद -

केरळचे मुख्यमंत्री सी.एच. मोहम्मद यांनाही फार काळ मुख्यमंत्रीपदी राहता आले नाही. मोहम्मद हे १२ ऑक्टोबर १९७९ ते १ डिसेंबर १९७९ असे फक्त ४५ दिवस मुख्यमंत्री होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसChief Ministerमुख्यमंत्रीMaharashtraमहाराष्ट्र