शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

महाराष्ट्रातील शेतकरी आहे देशात सर्वाधिक कर्जबाजारी; देशभरातील बळीराजावर तब्बल १२,१९,५१६ कोटींचे कर्ज थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 12:10 IST

कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही : अर्थमंत्री सीतारामन

चंद्रशेखर बर्वे

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबत नसतानाच देशभरातील शेतकऱ्यांवर १२ लाख १९ हजार ५१६ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. तर  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर ८,३८,२४९ कोटींचे कर्ज थकीत असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संदसेत दिली होती. ती पुन्हा चर्चेत आली आहे.

...तर लग्नाचे खोटे वचन देऊन लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप विवाहितेला करता येणार नाही

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यामुळे  शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, मागील १० वर्षांत तब्बल १,१२,००० शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला आहे.

२०१५ मध्ये १२ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर २०१९ पासून २०२२ पर्यंत आत्महत्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. एनसीआरबीचा २०२३ आणि २०२४ चा अहवाल अद्याप प्रकाशित झालेला नाही, हे येथे उल्लेखनीय आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर कोणत्या बँकेचे किती कर्ज?

महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्रातील शेतकरी देशात सर्वांत जास्त कर्जबाजारी आहे. येथील शेतकऱ्यांवर कमर्शियल बँकेचे ७,९३,७८९ कोटी, सहकारी बँकेचे ३५,४५६ कोटी आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे ९००४ कोटी असे ८,३८,२४९ कोटींचे कर्ज डोक्यावर आहे.

आत्महत्यांही वाढल्या

सततच्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आलेला असतानाच त्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर आणखी उंच होत आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत देशातील शेतकऱ्यांवर १२ लाख १९ हजार ५१६ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे.

 आरबीआय आणि नाबार्डने दिलेल्या माहितीवरून सीतारामन यांनी संसदेत ही माहिती दिली होती. थोडक्यात, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या व त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर गगनाला भिडण्याच्या मार्गावर आहे.

शेतकऱ्यांवर कोणत्या बँकेचे किती आहे कर्ज?

कमर्शियल बँकेचे ६,३४,२१६ कोटी, सहकारी बँकांचे २,६५,४१९ कोटी आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे ३,१९,८८१ कोटी असे १२ लाख १९ हजार ५१६ कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांवर थकीत आहे. मात्र, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी