शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवार-सोनिया गांधी यांच्यातील चर्चा अपूर्णच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:20 IST

राज्यातील सत्ताकोंडी कायम; काँग्रेसचा अंतिम निर्णय होणार दोन दिवसांनंतरच

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेसह सरकार स्थापन करण्याच्या विषयावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सोमवारी चर्चा केली. शिवसेनेला पाठिंबा देताना काही अटी निश्चित ठेवायला हव्यात, असे सोनिया यांनी पवार यांना सांगितले. त्यामुळे सरकारच्या स्वरूपाबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत पुन्हा भेटणार असून, त्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे.आपल्याला सरकारमध्ये अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी शिवसेनेवर राष्ट्रवादी दबाव आणत आहे. राष्ट्रवादीपेक्षा १0 आमदार कमी असलेल्या काँग्रेसलाही अधिक प्रतिनिधित्व हवे असल्याने, त्यावर दोन्ही पक्षांत चर्चा होणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, दोन दिवसांत दोन्ही पक्षांच्या नेत्यांत चर्चा होईल. त्यानंतर, सोनिया गांधी निर्णय घेतील.या चर्चेमध्ये काँग्रेसतर्फे मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात सहभागी होतील. त्यासाठी राष्ट्रवादीचे काही नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. सोनिया गांधी शिवसेनेसोबत जाण्यास साशंक आहेत. काँग्रेसच्या आमदारांना सरकारमध्ये असावे, असे वाटते. त्यामुळे हिंदुत्ववादासारखे काही मुद्दे शिवसेनेने दूर ठेवावेत, असा काँग्रेसचा आग्रह असेल. कोणाचे किती मंत्री असावेत, मुख्यमंत्रिपद पूर्ण काळ शिवसेनेकडेच असावे का? उपमुख्यमंत्री किती असावेत, हे स्पष्ट झाल्यानंतरच काँग्रेस भूमिका स्पष्ट करेल.आपल्यात एकमत होईपर्यंत कोणीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर करू नये, असे सोनिया गांधी व शरद पवार यांच्यात ठरल्याचे समजते. बहुधा त्याचमुळे पवार यांनी आमची सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नाही, असे सांगितले असावे, शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील लहान पक्षांनाही सरकारमध्ये स्थान असावे आणि मुळात त्यांची भूमिका ऐकून घ्यावी, असेही या दोन नेत्यांमध्ये ठरले आहे.पवारांच्या भेटीला संजय राऊतसोनिया गांधी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांची शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. मात्र, त्यांनीही राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाविषयी चर्चा झाली, असेच सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना